शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कृषी पुरस्काराच्या निवड यादीतून जिल्हा बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 21:39 IST

दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने राज्यातील शेतकरी व शेती संस्थांना विविध कृषी पुरस्कारांंनी सन्मानित केले जाते. त्यानुसार, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मागविलेल्या प्रस्तावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र विविध पुरस्कारांच्या निवड यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही शेतकरी व शेती संस्थेचा समावेश नाही.

ठळक मुद्देशेतकरी व संस्थांचे नावच नाही : सन २०१५-१६ मधील प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने राज्यातील शेतकरी व शेती संस्थांना विविध कृषी पुरस्कारांंनी सन्मानित केले जाते. त्यानुसार, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मागविलेल्या प्रस्तावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र विविध पुरस्कारांच्या निवड यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही शेतकरी व शेती संस्थेचा समावेश नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व शेतकरी नावापुरतेच आहेत काय? असा सवाल कृषी तज्ज्ञांकडून उपस्थित होऊ लागला आहे.कृषी क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाने प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी व शेतीविषयक संस्थांना प्रोत्साहन मिळावे हे प्रमुख उद्देश बाळगून राज्य शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्यावतीने विविध कृषी पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, कृषी भूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विखे पाटील कृषी पुरस्कार, कृषी सेवा रत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा आदी कृषी पुरस्कारांचा समावेश आहे. यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयामार्फत शेतकरी व कृषी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येते. त्यानंतर निकषांतर्गत गुणानुक्रमानुरुप पुरस्कारांसाठी निवड केली जात असते.कृषी विभागाच्या माध्यमातून पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेल्या पुरस्काराची निवड करुन राज्य शासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुरस्काराने शेतकरी किंबहूना शेती संस्थांना सन्मानित केले जाते.सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये मागविण्यात आलेल्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने (दि.२) शासन निर्णय निर्गमित करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या शेतकरी व संस्थांची नावे जाहीर करण्यात आली.मात्र निवड यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही शेतकरी व शेतीसंस्थांचा समावेश नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात प्रगतीशिल शेतकरी व कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था आहे की नाही? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. तर दुसरीकडे कृषी विभाग पुरस्कारासाठी शेतकऱ्यांना किंबहूना शेती संस्थांना प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात प्रेरीत करण्यात उदासीन आहे काय? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

टॅग्स :agricultureशेती