शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जिल्ह्यात २२८ बालके तीव्र कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:56 IST

आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात महिला व बाल कल्याण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या विभागाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत.

ठळक मुद्दे११३ बालके पोषाहार केंद्रात दाखल : महिला बाल कल्याण विभागाचे दुर्लक्ष

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात महिला व बाल कल्याण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या विभागाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. कुपोषणाच्या तिव्र श्रेणीत २२८ बालके असून या बालकांपैकी ११३ बालकांना एकात्मिक बाल विकास केंद्रामध्ये (व्हीसीडीसी) दाखल करण्यात आले.गोंदिया जिल्ह्यात कुपोषित १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. यातील २२८ बालके तिव्र कुपोषित म्हणजे (सॅम) व ८१० बालके मध्यम तिव्र कुपोषणाच्या (मॅम) या श्रेणीत आहेत. या कुपोषित बालकांसाठी चार तालुक्यात ५४ ठिकाणी एकात्मिक बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली.या केंद्रावर सॅमचे १४ व मॅमचे ५६ बालकांचा समावेश आहे. १८ बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. यात सॅमचे ७ तर मॅमच्या ११ बालकांचा समावेश आहे. या वेळी सॅमचे १२८ व मॅमचे ८० बालके आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी व्हीसीडी स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुपोषणावर मात जेवढ्या पध्दतीने व्हायला पाहिजे तेवढे नियंत्रण झाले नाही.जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव व तिरोडा तालुक्यात चाइल्ड ट्रीटमेंट सेंटर (सीटीसी) सुरू करण्यात आले आहे. बाई गंगाबाई महिला रूग्णालयात न्यूट्रेशियन रिहबेट सेंटर (एनआरसी) सुरू आहे. आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास केंद्राच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनाचे काम केले जात आहे. परंतु ते काम संथ गतीने सुरू आहे.गर्भवतींकडे होतोय दुर्लक्षमहिला गर्भवती असताना तिला संतुलीत आहार देणे गरजेचे असते. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील लोक गर्भवती महिलेच्या आहाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने गर्भातच बाळाची वाढ खुंटते. परिणामी कुपोषित बालके जन्माला येतात. महिलांना गर्भावस्थेत आहार कसा द्यावा याची माहिती कुटुंबीयांना दिली जात नाही. परिणामी कुपोषणाच्या समस्येत वाढ होत आहे.अंगणवाडीतून मिळणारा आहार जनावरांनागर्भवती, किशोरवयीन मुली किंवा बालकांना महिन्याकाठी पोषण आहार म्हणून महिला बाल कल्याण विभागाच्या अंगणवाड्यामार्फत पोषण आहार दिला जातो. परंतु त्या आहारात रुचकरपणा नसल्यामुळे गर्भवती महिला, किशोरवयीन मुली व बालके तो आहार खात नाही. परिणामी तो आहार जनावरांना दिला जातो.५२ बालके कुपोषणाच्या संकटातग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ५२ बालके आजही कुपोषणात आहेत. यात सॅमचे ७ तर मॅमच्या ४५ बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११३ बाल विकास केंद्र सुरू आहेत. यात सॅमचे १२२ तर मॅमचे ८० बालके दाखल आहेत.