शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

जिल्ह्यात २२८ बालके तीव्र कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:56 IST

आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात महिला व बाल कल्याण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या विभागाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत.

ठळक मुद्दे११३ बालके पोषाहार केंद्रात दाखल : महिला बाल कल्याण विभागाचे दुर्लक्ष

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात महिला व बाल कल्याण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या विभागाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. कुपोषणाच्या तिव्र श्रेणीत २२८ बालके असून या बालकांपैकी ११३ बालकांना एकात्मिक बाल विकास केंद्रामध्ये (व्हीसीडीसी) दाखल करण्यात आले.गोंदिया जिल्ह्यात कुपोषित १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. यातील २२८ बालके तिव्र कुपोषित म्हणजे (सॅम) व ८१० बालके मध्यम तिव्र कुपोषणाच्या (मॅम) या श्रेणीत आहेत. या कुपोषित बालकांसाठी चार तालुक्यात ५४ ठिकाणी एकात्मिक बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली.या केंद्रावर सॅमचे १४ व मॅमचे ५६ बालकांचा समावेश आहे. १८ बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. यात सॅमचे ७ तर मॅमच्या ११ बालकांचा समावेश आहे. या वेळी सॅमचे १२८ व मॅमचे ८० बालके आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी व्हीसीडी स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुपोषणावर मात जेवढ्या पध्दतीने व्हायला पाहिजे तेवढे नियंत्रण झाले नाही.जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव व तिरोडा तालुक्यात चाइल्ड ट्रीटमेंट सेंटर (सीटीसी) सुरू करण्यात आले आहे. बाई गंगाबाई महिला रूग्णालयात न्यूट्रेशियन रिहबेट सेंटर (एनआरसी) सुरू आहे. आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास केंद्राच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनाचे काम केले जात आहे. परंतु ते काम संथ गतीने सुरू आहे.गर्भवतींकडे होतोय दुर्लक्षमहिला गर्भवती असताना तिला संतुलीत आहार देणे गरजेचे असते. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील लोक गर्भवती महिलेच्या आहाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने गर्भातच बाळाची वाढ खुंटते. परिणामी कुपोषित बालके जन्माला येतात. महिलांना गर्भावस्थेत आहार कसा द्यावा याची माहिती कुटुंबीयांना दिली जात नाही. परिणामी कुपोषणाच्या समस्येत वाढ होत आहे.अंगणवाडीतून मिळणारा आहार जनावरांनागर्भवती, किशोरवयीन मुली किंवा बालकांना महिन्याकाठी पोषण आहार म्हणून महिला बाल कल्याण विभागाच्या अंगणवाड्यामार्फत पोषण आहार दिला जातो. परंतु त्या आहारात रुचकरपणा नसल्यामुळे गर्भवती महिला, किशोरवयीन मुली व बालके तो आहार खात नाही. परिणामी तो आहार जनावरांना दिला जातो.५२ बालके कुपोषणाच्या संकटातग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ५२ बालके आजही कुपोषणात आहेत. यात सॅमचे ७ तर मॅमच्या ४५ बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११३ बाल विकास केंद्र सुरू आहेत. यात सॅमचे १२२ तर मॅमचे ८० बालके दाखल आहेत.