शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२८ बालके तीव्र कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:56 IST

आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात महिला व बाल कल्याण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या विभागाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत.

ठळक मुद्दे११३ बालके पोषाहार केंद्रात दाखल : महिला बाल कल्याण विभागाचे दुर्लक्ष

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात महिला व बाल कल्याण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या विभागाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. कुपोषणाच्या तिव्र श्रेणीत २२८ बालके असून या बालकांपैकी ११३ बालकांना एकात्मिक बाल विकास केंद्रामध्ये (व्हीसीडीसी) दाखल करण्यात आले.गोंदिया जिल्ह्यात कुपोषित १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. यातील २२८ बालके तिव्र कुपोषित म्हणजे (सॅम) व ८१० बालके मध्यम तिव्र कुपोषणाच्या (मॅम) या श्रेणीत आहेत. या कुपोषित बालकांसाठी चार तालुक्यात ५४ ठिकाणी एकात्मिक बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली.या केंद्रावर सॅमचे १४ व मॅमचे ५६ बालकांचा समावेश आहे. १८ बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. यात सॅमचे ७ तर मॅमच्या ११ बालकांचा समावेश आहे. या वेळी सॅमचे १२८ व मॅमचे ८० बालके आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी व्हीसीडी स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुपोषणावर मात जेवढ्या पध्दतीने व्हायला पाहिजे तेवढे नियंत्रण झाले नाही.जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव व तिरोडा तालुक्यात चाइल्ड ट्रीटमेंट सेंटर (सीटीसी) सुरू करण्यात आले आहे. बाई गंगाबाई महिला रूग्णालयात न्यूट्रेशियन रिहबेट सेंटर (एनआरसी) सुरू आहे. आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास केंद्राच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनाचे काम केले जात आहे. परंतु ते काम संथ गतीने सुरू आहे.गर्भवतींकडे होतोय दुर्लक्षमहिला गर्भवती असताना तिला संतुलीत आहार देणे गरजेचे असते. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील लोक गर्भवती महिलेच्या आहाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने गर्भातच बाळाची वाढ खुंटते. परिणामी कुपोषित बालके जन्माला येतात. महिलांना गर्भावस्थेत आहार कसा द्यावा याची माहिती कुटुंबीयांना दिली जात नाही. परिणामी कुपोषणाच्या समस्येत वाढ होत आहे.अंगणवाडीतून मिळणारा आहार जनावरांनागर्भवती, किशोरवयीन मुली किंवा बालकांना महिन्याकाठी पोषण आहार म्हणून महिला बाल कल्याण विभागाच्या अंगणवाड्यामार्फत पोषण आहार दिला जातो. परंतु त्या आहारात रुचकरपणा नसल्यामुळे गर्भवती महिला, किशोरवयीन मुली व बालके तो आहार खात नाही. परिणामी तो आहार जनावरांना दिला जातो.५२ बालके कुपोषणाच्या संकटातग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ५२ बालके आजही कुपोषणात आहेत. यात सॅमचे ७ तर मॅमच्या ४५ बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११३ बाल विकास केंद्र सुरू आहेत. यात सॅमचे १२२ तर मॅमचे ८० बालके दाखल आहेत.