शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

फक्त १० शाळांत गणवेश वाटप

By admin | Updated: July 3, 2015 01:56 IST

वेळीच निधी न मिळाल्याने यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम फिस्कटला.

कपिल केकत गोंदियावेळीच निधी न मिळाल्याने यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम फिस्कटला. जिल्ह्यातील फक्त १० शाळांतच पहिल्या दिवशी गणवेश वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. निधीअभावी हा कार्यक्रम अयशस्वी ठरला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांवर भागवून घ्यावे लागले. एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान राबविले जात आहे. यांतर्गत मूले व त्यांच्या पालकांना शाळेप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, मध्यान्ह भोजन व अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत. शासनाचा हा उदात्त हेतू लक्षात घेऊन यंत्रणा जोमाने कामाला लागते व विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहचविते. यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे निर्देश होते. येथील सर्व शिक्षा अभियानकडून यंदा ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधी मागण्यात आला होता. यासाठी सर्व शिक्षा अभियानकडून डिसेंबर महिन्यातच तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र शासनाच्या लेटलतीफ कार्यप्रणालीमुळे जिल्हास्तरावर निधी मिळण्यास बराच उशीर लागला. तर गणवेश वाटपासाठी जिल्हास्तरावरून मागणी करण्यात आलेला निधी विभागाला २२ जून रोजी प्राप्त झाला. निधी प्राप्त झाल्याच्या चार दिवसानंतरच म्हणजेच २६ जून रोजी शाळेचा पहिला ठोका वाजणार होता. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करणे अशक्य होते. नेमकी हीच बाब घडली व शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाचा कार्यक्रम अयशस्वी ठरला. यातून शासकीय यंत्रणा किती तत्परतेने कार्य करते हे दिसून येते. पहिल्यांदाच मिळाला पूर्ण निधीयेथील सर्व शिक्षा विभागाने मागणी केल्यानुसार तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधी शासनाने पाठविला. मात्र त्यात उशिर झाल्याने गणवेश वाटपाचा कार्यक्रम अयशस्वी ठरला. ते काही असो मात्र गणवेश वाटप कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मागणीनुसार पूर्ण निधी मिळाल्याचे विभागाकडून कळले. यापूर्वी कधीही शासनाकडून पूर्ण निधी मिळालेला नसल्याचीही माहिती आहे. ५० टक्के शाळांनाच मिळाला निधी शासनाकडून विभागाकडे आलेला निधी तालुकास्तरावर टाकण्यात आला आहे. मात्र तालुकास्तरावरून अद्याप शाळांपर्यंत निधी पोहचलेला नाही. विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ५० टक्के शाळांपर्यंतच निधी पोहचला आहे. तर ५० टक्के शाळांना अद्याप निधी देण्यात आलेला नाही. हाती पैसाच नसताना विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे कठिण काम होते. त्याचा परिणामही शाळेच्या पहिल्या दिवशी दिसून आला.

फक्त १० शाळांत गणवेश वाटप