शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

फक्त १० शाळांत गणवेश वाटप

By admin | Updated: July 3, 2015 01:56 IST

वेळीच निधी न मिळाल्याने यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम फिस्कटला.

कपिल केकत गोंदियावेळीच निधी न मिळाल्याने यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम फिस्कटला. जिल्ह्यातील फक्त १० शाळांतच पहिल्या दिवशी गणवेश वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. निधीअभावी हा कार्यक्रम अयशस्वी ठरला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांवर भागवून घ्यावे लागले. एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान राबविले जात आहे. यांतर्गत मूले व त्यांच्या पालकांना शाळेप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, मध्यान्ह भोजन व अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत. शासनाचा हा उदात्त हेतू लक्षात घेऊन यंत्रणा जोमाने कामाला लागते व विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहचविते. यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे निर्देश होते. येथील सर्व शिक्षा अभियानकडून यंदा ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधी मागण्यात आला होता. यासाठी सर्व शिक्षा अभियानकडून डिसेंबर महिन्यातच तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र शासनाच्या लेटलतीफ कार्यप्रणालीमुळे जिल्हास्तरावर निधी मिळण्यास बराच उशीर लागला. तर गणवेश वाटपासाठी जिल्हास्तरावरून मागणी करण्यात आलेला निधी विभागाला २२ जून रोजी प्राप्त झाला. निधी प्राप्त झाल्याच्या चार दिवसानंतरच म्हणजेच २६ जून रोजी शाळेचा पहिला ठोका वाजणार होता. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करणे अशक्य होते. नेमकी हीच बाब घडली व शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाचा कार्यक्रम अयशस्वी ठरला. यातून शासकीय यंत्रणा किती तत्परतेने कार्य करते हे दिसून येते. पहिल्यांदाच मिळाला पूर्ण निधीयेथील सर्व शिक्षा विभागाने मागणी केल्यानुसार तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधी शासनाने पाठविला. मात्र त्यात उशिर झाल्याने गणवेश वाटपाचा कार्यक्रम अयशस्वी ठरला. ते काही असो मात्र गणवेश वाटप कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मागणीनुसार पूर्ण निधी मिळाल्याचे विभागाकडून कळले. यापूर्वी कधीही शासनाकडून पूर्ण निधी मिळालेला नसल्याचीही माहिती आहे. ५० टक्के शाळांनाच मिळाला निधी शासनाकडून विभागाकडे आलेला निधी तालुकास्तरावर टाकण्यात आला आहे. मात्र तालुकास्तरावरून अद्याप शाळांपर्यंत निधी पोहचलेला नाही. विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ५० टक्के शाळांपर्यंतच निधी पोहचला आहे. तर ५० टक्के शाळांना अद्याप निधी देण्यात आलेला नाही. हाती पैसाच नसताना विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे कठिण काम होते. त्याचा परिणामही शाळेच्या पहिल्या दिवशी दिसून आला.

फक्त १० शाळांत गणवेश वाटप