शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजी विक्रेत्यांना छत्री व बॅनरचे वाटप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:38 IST

बोंडगावदेवी : शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळावे, त्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळावी. योग्य भाव मिळून हातामध्ये पैसा खेळता राहावा. ...

बोंडगावदेवी : शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळावे, त्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळावी. योग्य भाव मिळून हातामध्ये पैसा खेळता राहावा. बाजारात शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल हमखास ओळखून यावा, यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विकेल ते पिकेल या संकल्पनेतून संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना छत्री व बॅनर विनामूल्य वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांनी पिकविलेला विषमुक्त भाजीपाला सहज उपलब्ध व्हावा अशी प्रत्येक सामान्य जनतेची अपेक्षा असते. भाजीपाला, फळे, धान्य थेट शेतकऱ्यांकडून विकत घेता यावे असे ग्राहकांना वाटते. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन उत्पादित केलेला माल खरेदी करणे ग्राहकांना शक्य होत नाही. गावातील आठवडी बाजार, गुजरीमध्येसुद्धा विक्री करणारे शेतकरी असतात; परंतु ग्राहकांना ते ओळखता येत नाही. बाजारातील भाजीपाला विकणारा शेतकरी सहज ओळखून यावा या हेतूने संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत कृषी विभाग, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांना एक छत्री व बॅनर वाटप करण्यात आले. त्यावर अभियानाचे लोगो, नाव, कृषी विभागाचे नाव रेखांकित असल्याने तो भाजीपाला विक्रेता ग्राहकांना हमखास ओळखता येतो. बाजारात छत्री व बॅनर दिसल्याने ग्राहक आकर्षिल्या जात आहे. कृषी विभागाच्या या नावीण्यपूर्ण उपक्रमाने भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली. शेतकऱ्यांचा शेतमाल जलदगतीने विक्री होतो. स्वत: पिकविलेला शेतमाल मनाजोगे भावाने विक्री करणे सहज शक्य होऊन हातामध्ये पैसा खेळता राहत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडायला वेळ लागत नाही. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे व इतर कर्मचारी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.