शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

५१ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By admin | Updated: April 10, 2015 01:24 IST

अदानी फाऊंडेशनकडून सामजिक दायित्वाअंतर्गत नजीकच्या ५१ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला मेळावासुद्धा पार पडला.

तिरोडा : अदानी फाऊंडेशनकडून सामजिक दायित्वाअंतर्गत नजीकच्या ५१ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला मेळावासुद्धा पार पडला.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर, प्रा. सविता बेदरकर, सभापती ललिता जांभुळकर, खंडविकास अधिकारी जमईवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. कंचन रहांगडाले, अंगणवाडी पर्यवेक्षक डॉ. रिचा खरे, योगिता पद्मशाली, देशपांडे तसेच अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे स्टेशन प्रमुख सी.पी. साहू, जनरल मॅनेजर संजय अरगडे, सहयोगी महाव्यवस्थापक ए.पी.सिंग व समन्वयक सुबोध सिंग हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांचा सहभाग होता.कार्यक्रमाची सुरुवात भारतातील प्रथम मुख्याध्यापिका तसेच भारत भूमितील समस्त नारी जातीला स्वत्वाची जाणिव निर्माण करुन देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली.आपल्या प्रास्ताविकात सुबोध सिंग यांनी सांगितले की, अदानी फाऊंडेश्न मागील पाच वर्षापासून अंगणवाडी सशक्तीकरणाकरिता कार्यरत आहे. त्यातच आणखी एक भर म्हणून अंगणवाडीकरिता शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. उद्घाटक राजलक्ष्मी तुरकर यांनी आपल्या भाषणातून अदानी फाऊंडेश्नचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून ‘सुदृढ महिला स्वस्थ परिवार’ ही संकल्पना अदानी फाऊंडेशन खऱ्या अर्थाने अंमलात आणत असल्याचे सांगितले.खंड विकास अधिकारी जमईवार यांनी आपल्या भाषणातून, अंगणवाडीच्या मुला-मुलींची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कशा प्रकारे कार्ययोजना बनविता येईल यावर मार्गदर्शन केले. सुकन्या योजना, निर्भया योजना, बालसंगोपन, त्याचबरोबर अंगणवाडीला बालविवाह माहिती बाल कल्याण विकास अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. अदानी फाऊंडेशनच्या वतीने त्याचा वापर पुरेपूर मुलांकरिता करावे. जेणेकरुन मुलांना खेळण्याबाळगण्याला पुरेपूर वेळ मिळेल. स्टेशन प्रमुख सी.पी. साहू यांनी आपल्या मनोगतात अदानी फाऊंडेशन हे महिला सक्षमीकरणासंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवित असून यापुढेही गरजेवर आधारित महिलांना सुदृढ करण्यासाठी आम्ही अदानी फाऊंडेशनकडून असेच उपक्रम राबवित राहू, अशी ग्वाही दिली.डॉ.पर्णा बारडोलोई आणि डॉ. रिचा खरे यांनी महिलांना आपल्या आरोग्यासाठी जागरुक राहून योग्य तऱ्हेने उपलब्ध संसाधनातून तसेच हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करुन आपले हिमोग्लोबीन कसे अबाधित राखता येईल यावर मार्गदर्शन केले. शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा. सविता बेदरकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्त्रीने आर्थिक, सामाजिक, मानसिक व बौद्धीकदृष्ट्या सबल होण्याबरोबरच शारीरिकदृष्ट्या सबल होणे महत्वाचे आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण या दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत. निर्णय घेण्याचा अधिकार महिलांना द्या. जर झाडाच्या मुळाला पाणी दिले नाही तर निश्चित त्यातून निघणाऱ्या फांद्या, पाने, फुले मजबूत राहणार नाही. तसेच स्त्रीसुद्धा कुटुंबाचे मूळ आहे. जोपर्यंत ती सक्षम होणार नाही तोपर्यंत कुटुंब सक्षम होणार नाही. पर्यायाने देशाच्या विकासासाठी स्त्री सक्षम होणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले.कार्यक्रमाच्या शेवटी अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. एकूण १८ गावातील महिला सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस व १०० च्यावर महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संचालन जयश्री काळे व आभार स्वप्नील वहाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अदानी फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)