शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांनी मांडल्या व्यथा

By admin | Updated: November 18, 2015 01:54 IST

आपल्या गृहजिल्ह्यात बदली होण्याची प्रतीक्षा करीत मागील १० ते १२ वर्षापासून परजिल्ह्यात सेवा देत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

गोंदिया : आपल्या गृहजिल्ह्यात बदली होण्याची प्रतीक्षा करीत मागील १० ते १२ वर्षापासून परजिल्ह्यात सेवा देत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सोमवारी या शिक्षकांनी आपली व्यथा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेसमोर मांडली. त्यांची परिस्थिती ऐकून आणि केवळ काही अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे व गैरसमजामुळे त्यांना आतापर्यंत हा त्रास सहन करावा लागल्याचे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारीही सुन्न झाले. या शिक्षकांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.आंतरजिल्हा बदली प्रक्रिया काही वर्षापासून बंद असल्यामुळे शंभरावर शिक्षक गोंदिया जिल्हा परिषदेत पदस्थापना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदली कृती समितीमार्फत दि. १६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. जिल्हा परिषद प्रशासनातील पदाधिकारी व अधिकारी यांनी आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या व्यथा ऐकून त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे सकारात्मक आश्वासन दिले. जिल्हा परिषदेतील काही वर्षापासून रखडलेले केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पदे पदवीधर, पदोन्नतीने येत्या २ महिन्यात भरून रिक्त होणाऱ्या जागेवर आंतरजिल्हा बदलीतून शिक्षकांना पदस्थापना देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी सर्व प्रकारच्या जिल्हा बदलीवरील स्थगिती उठली असून पदोन्नती व संच मान्यता झाल्यावर तसेच सेवानिवृत्ती व निधनाने रिक्त जागेवर पदस्थापना देण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसात आढावा घेणार असल्याचे पी.जी.कटरे म्हणाले. जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनीही अनुकूलता दर्शविली.(जिल्हा प्रतिनिधी) अन् अधिकारी-पदाधिकारी गहिवरलेअनेक वर्षापासून परजिल्ह्यात ४०० ते १६०० किमी अंतरावर कुटूंबापासून व घरापासून लांब कार्यरत असल्यामुळे त्यांना कौटुंबिक सुखापासून वंचित रहावे लागत आहे. कुणाचे आई-वडील आजारी आहेत तर कुणाचे मुलबाळ गावाकडे आहेत. हजारो किलोमीटर अंतरावर कार्यरत असल्यामुळे या शिक्षकांची सहा-सहा महिने भेट होत नाही. त्यामुळे आई-वडीलांचा वृध्दापकाळातील आजारपणाचा आधारच हरवला आहे. अनेक पती-पत्नी हजारे किमी अंतरावर कार्यरत असल्यामुळे त्यांच्यात घटस्फोटापर्यंत नाते ताणले गेले आहेत. काही शिक्षकांनी आई-वडील, नातेवाईक यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार सुध्दा करता आले नाही. शिक्षकांच्या अशा अनेक समस्या ऐकून अधिकारी व पदाधिकारी गहिवरले.