शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांनी मांडल्या व्यथा

By admin | Updated: November 18, 2015 01:54 IST

आपल्या गृहजिल्ह्यात बदली होण्याची प्रतीक्षा करीत मागील १० ते १२ वर्षापासून परजिल्ह्यात सेवा देत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

गोंदिया : आपल्या गृहजिल्ह्यात बदली होण्याची प्रतीक्षा करीत मागील १० ते १२ वर्षापासून परजिल्ह्यात सेवा देत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सोमवारी या शिक्षकांनी आपली व्यथा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेसमोर मांडली. त्यांची परिस्थिती ऐकून आणि केवळ काही अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे व गैरसमजामुळे त्यांना आतापर्यंत हा त्रास सहन करावा लागल्याचे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारीही सुन्न झाले. या शिक्षकांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.आंतरजिल्हा बदली प्रक्रिया काही वर्षापासून बंद असल्यामुळे शंभरावर शिक्षक गोंदिया जिल्हा परिषदेत पदस्थापना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदली कृती समितीमार्फत दि. १६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. जिल्हा परिषद प्रशासनातील पदाधिकारी व अधिकारी यांनी आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या व्यथा ऐकून त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे सकारात्मक आश्वासन दिले. जिल्हा परिषदेतील काही वर्षापासून रखडलेले केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पदे पदवीधर, पदोन्नतीने येत्या २ महिन्यात भरून रिक्त होणाऱ्या जागेवर आंतरजिल्हा बदलीतून शिक्षकांना पदस्थापना देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी सर्व प्रकारच्या जिल्हा बदलीवरील स्थगिती उठली असून पदोन्नती व संच मान्यता झाल्यावर तसेच सेवानिवृत्ती व निधनाने रिक्त जागेवर पदस्थापना देण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसात आढावा घेणार असल्याचे पी.जी.कटरे म्हणाले. जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनीही अनुकूलता दर्शविली.(जिल्हा प्रतिनिधी) अन् अधिकारी-पदाधिकारी गहिवरलेअनेक वर्षापासून परजिल्ह्यात ४०० ते १६०० किमी अंतरावर कुटूंबापासून व घरापासून लांब कार्यरत असल्यामुळे त्यांना कौटुंबिक सुखापासून वंचित रहावे लागत आहे. कुणाचे आई-वडील आजारी आहेत तर कुणाचे मुलबाळ गावाकडे आहेत. हजारो किलोमीटर अंतरावर कार्यरत असल्यामुळे या शिक्षकांची सहा-सहा महिने भेट होत नाही. त्यामुळे आई-वडीलांचा वृध्दापकाळातील आजारपणाचा आधारच हरवला आहे. अनेक पती-पत्नी हजारे किमी अंतरावर कार्यरत असल्यामुळे त्यांच्यात घटस्फोटापर्यंत नाते ताणले गेले आहेत. काही शिक्षकांनी आई-वडील, नातेवाईक यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार सुध्दा करता आले नाही. शिक्षकांच्या अशा अनेक समस्या ऐकून अधिकारी व पदाधिकारी गहिवरले.