शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
3
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
7
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
8
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
9
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
10
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
11
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
12
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
13
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
14
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
15
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
18
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
19
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
20
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश

जिल्ह्यात रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:50 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील ९२ हजार हेक्टरमधील रोवण्या खोळंबल्या आहे.

ठळक मुद्देपाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातूर : ९२ हजार ६३४ हेक्टराला फटका

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील ९२ हजार हेक्टरमधील रोवण्या खोळंबल्या आहे. येत्या तीन चार दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात धान पिकाच्या लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत रोवणी व आवत्या मिळून केवळ ८५ हजार ५९७ हेक्टरमध्ये (४८ टक्के) रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल ९२ हजार ६३४ हेक्टर रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत.हवामान विभागाने यंदा सुरूवातीपासून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यावरच विश्वास ठेऊन शेतकºयांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण मे महिन्यात आटोपली. मात्र, यंदा सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली. हवामान विभागाचे सर्व अंदाज फोल ठरल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रोपवाटिकेचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ८१६ हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी १८ हजार ०७६ हेक्टरमध्ये शेतकºयांनी केली आहे. याची टक्केवारी ९६ असून अनेक शेतकºयांनी त्या रोपांची रोवणी अद्यापही अनेक केली नाही. त्यांची रोवणी न झाल्याने शेतातील पºहे तसेच आहेत. शिवाय पºहे अधिक दिवसांची झाल्याने ती रोवणी योग्य राहिलेली नाही. परिणामी शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याचे चिन्ह आहे.कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यात रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. मात्र रोवणी केवळ ७६ हजार ०६६ हेक्टर क्षेत्रात (४३ टक्के) व आवत्या नऊ हजार ५३१ हेक्टरमध्ये झाल्या आहेत. पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने कृषी विभागाकडून रोवणीपासून वंचित असलेले क्षेत्र व ज्यांची रोवणी आटोपली मात्र पाण्याअभावी रोवलेले पºहे वाळत आहेत अशा शेताचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे.शासनाने मागविला अहवालपावसाअभावी विदर्भातील अनेक भागात दुष्काळी परिस्थितीचे चित्र आहे. जिल्ह्यातील किती हेक्टरमधील रोवणी खोळंबली आहेत व किती हेक्टरमधील पºहे वाळली याची माहिती शासनाने कृषी विभागाकडून मागविली आहे.ज्या शेतकºयांची रोवणी रखडली आहेत किंवा रोवणी आटोपून पावसाअभावी पºहे वाळत आहेत. पाण्याअभावी ज्यांनी पेरणी केली नाही अशा सर्व शेतकºयांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया