शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:50 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील ९२ हजार हेक्टरमधील रोवण्या खोळंबल्या आहे.

ठळक मुद्देपाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातूर : ९२ हजार ६३४ हेक्टराला फटका

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील ९२ हजार हेक्टरमधील रोवण्या खोळंबल्या आहे. येत्या तीन चार दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात धान पिकाच्या लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत रोवणी व आवत्या मिळून केवळ ८५ हजार ५९७ हेक्टरमध्ये (४८ टक्के) रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल ९२ हजार ६३४ हेक्टर रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत.हवामान विभागाने यंदा सुरूवातीपासून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यावरच विश्वास ठेऊन शेतकºयांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण मे महिन्यात आटोपली. मात्र, यंदा सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली. हवामान विभागाचे सर्व अंदाज फोल ठरल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रोपवाटिकेचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ८१६ हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी १८ हजार ०७६ हेक्टरमध्ये शेतकºयांनी केली आहे. याची टक्केवारी ९६ असून अनेक शेतकºयांनी त्या रोपांची रोवणी अद्यापही अनेक केली नाही. त्यांची रोवणी न झाल्याने शेतातील पºहे तसेच आहेत. शिवाय पºहे अधिक दिवसांची झाल्याने ती रोवणी योग्य राहिलेली नाही. परिणामी शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याचे चिन्ह आहे.कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यात रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर आहे. मात्र रोवणी केवळ ७६ हजार ०६६ हेक्टर क्षेत्रात (४३ टक्के) व आवत्या नऊ हजार ५३१ हेक्टरमध्ये झाल्या आहेत. पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने कृषी विभागाकडून रोवणीपासून वंचित असलेले क्षेत्र व ज्यांची रोवणी आटोपली मात्र पाण्याअभावी रोवलेले पºहे वाळत आहेत अशा शेताचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे.शासनाने मागविला अहवालपावसाअभावी विदर्भातील अनेक भागात दुष्काळी परिस्थितीचे चित्र आहे. जिल्ह्यातील किती हेक्टरमधील रोवणी खोळंबली आहेत व किती हेक्टरमधील पºहे वाळली याची माहिती शासनाने कृषी विभागाकडून मागविली आहे.ज्या शेतकºयांची रोवणी रखडली आहेत किंवा रोवणी आटोपून पावसाअभावी पºहे वाळत आहेत. पाण्याअभावी ज्यांनी पेरणी केली नाही अशा सर्व शेतकºयांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया