शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्थेचा अडेलतट्टूपणा

By admin | Updated: January 4, 2017 00:55 IST

कारण न देता शाळेत कार्यरत कर्मचाऱ्यास कामावरून कमी करण्यात आले.

कारण न देता कर्मचाऱ्याला काढले : उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अवमानना खातिया : कारण न देता शाळेत कार्यरत कर्मचाऱ्यास कामावरून कमी करण्यात आले. यावर उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही शाळेकडून न्यायालयाची आदेशाची अवमानना करीत उडेलतट्टूपणाचे धोरण शाळेकडून अवलंबिले जात आहे. गोंदियाच्या डॉ. आंबेडकर विद्यालयाचे हे प्रकरण असून संस्थेच्या अडेलतट्टूपणामुळे मात्र सदर कर्मचाऱ्याला त्रास सहन करावा लागत आहे. सविस्तर असे की, येथील संजय श्रीचंद मेश्राम यांची गोंदियातील डॉ.आंबेडकर विद्यालयात परिचराच्या मंजूर पदावर १.सप्टेंबर २००३ रोजी परीविक्षाधिन कालावधी करीता संस्थेद्वारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १ मे २००५ रोजी त्याची प्रयोगशाळा परिचराच्या पदावर पदोन्नती करण्यात आली. तसेच त्याची सेवा दि.१ सप्टेंबर २००५ रोजी कायम करण्यात आली. सदर संस्था बदलामुळे नवीन संस्था दिक्षाभुमी शिक्षण संस्था वरठी (भंडारा) या संस्थेचे संचालक वसंतराव हुमने यांनी कोणतेही कारण न देता सदर कर्मचाऱ्याला १८ मे २००६ रोजी सेवेतून कमी केले होते. त्यामुळे मेश्राम यांनी शालेय न्यायाधिकरण चंद्रपूर-नागपूर येथे सेवा समाप्तीच्या आदेशा विरुद्ध याचिका दाखल केली. यात २१ आॅक्टोबर २०११ रोजी मेश्राम यांना रुजू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र संस्थेकडून मेश्राम यांना रुजू करण्यात ाले नाही. उलट आदेशा विरुद्ध संस्थेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल ३० जून २०१४ रोजी लागला व मेश्राम यांना एका आठवड्याच्या आत प्रयोगशाळा परिचर या पदावर रुजू करण्याचे आदेश पारित करण्यात आले असतानाही त्यांना सेवेत रुजू करुन घेण्यात आले नाही. यावर त्यांनी पुन्हा खंडपीठात याचिका टाकली असता त्यातही ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी कामावर रुजू करुन घेण्याबाबद निर्णय न्यायालयाने दिला. मात्र संस्थेने मेश्राम यांना कामावर रुजू केले नाही. या उलट संस्था संचालकांनी महाराष्ट्र शासना विरुद्ध नागपूर खंडपिठात रिट याचीका दाखल केली. या याचिकेचा निकाल २२ जून २०१६ रोजी लागला व त्यात मेश्राम यांना २७ जून २०१६ पासून अतिरिक्त प्रयोगशाळा परिचर या पदावर पूर्ववत कामावर रुजू करण्याचे आदेश संबंधित संस्था व मुख्याध्यापकांना देण्यात आले. तसेच शालेय न्यायाधिकरणाचे आदेश झाल्यापासून अर्थात २१ आॅक्टोबर २०११ ते २७ जून २०१६ पर्यंतचे थकीत वेतन न्यायालयात तातडीने जमा करण्याचे आदेश संस्थेच्या संचालकाला देण्यात आले. या आदेशानुसार मुख्याध्यापकांनी मेश्राम यांना नाममात्र कामावर रुजू करुन घेतले व २७ जून २०१६ ते २३ जुलै २०१६ पर्यंत शाळेच्या हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करु दिली. परंतु २४ जुलै पासून मेश्राम नियमित हजर राहून सुद्धा अद्यापपर्यंत हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यास त्यांना मनाई केली. तसेच त्यांचे नियमित व थकीत वेतन सुद्धा काढले नाही. या संदर्भात मेश्राम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली असूनही संबंधितांनी अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर) मेश्राम यांचा आंदोलनाचा इशारा न्यायालयाने आदेश देऊनही शिक्षण संस्थेकडून अडेलतट्टूपणा केला जात आहे. मागील १४ वर्षांपासून हेच टोलवाटोलवीचे धोरण केला जात असल्याने मेश्राम यांना आपल्या परिवाराचा उदर निर्वाह कसा करावा असा प्रश्न पडला आहे. पगार काढण्यात आला नसल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत असतानाच मानसीक त्रास होत असून त्यांच्या मुला-बाळांचे शिक्षण कठिण झाले आहे. अशात त्यांना न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.