शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीचा विळखा

By admin | Updated: January 18, 2015 22:46 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे. आजघडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनला आहे.

गोंदिया : शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे. आजघडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनला आहे. त्यातच शहरातील सांडपाणीही जात असल्याने दुर्गंधीचा जोर वाढतच चालला आहे. यामुळे तलावाच्या पाण्याची दुर्गंधी येत असून याचा त्रास तलावाच्या सभोवताल असलेल्या कुटुंब तसेच परिसरातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असून नागरिकही स्वत:ची सामाजिक जबाबदारी विसरले असल्याचे दिसून येत आहे. सरकारी तलावामुळे जमिनीतील पाण्याचे स्तर वाढण्यास मदत होत आहे. असे असताना मात्र या तलावाचे आता हाल होऊ लागले आहेत. तलावात सांडपाणी जात असल्याने तलावाचे पाणी खराब झाले आहे. शिवाय यातून दुर्गंध पसरत असल्याने येथील नागरिकही यापासून त्रस्त झाले आहे. येथे पसरलेल्या घाणीमुळे डुकरांचा वावर वाढला आहे. या तलावाच्या काठावरच हनुमानाचे मंदिर आहे. परिसरातील रहिवासी या मंदिरात विविध सण व उत्सव साजरा करीत असल्याने नेहमीच येथे रेलचेल असते. तर जवळच दरगा असल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. शिवाय सरकारी तलावाचा हा भाग बाजार भागाशी जुळलेला असल्याने मोठ्या प्रमाणात दुकाने ही येथे आहेत. अशात तलावातील दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांनाही नाक दाबबन बसावे लागत आहे. शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने तलावाचे पाणी चांगले असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र तलावातील पाणी घाण झाल्यामुळे यावर त्वरित उपाययोजनेची गरज आहे. या तलावाच्या बाजूने अंडरग्राऊंड मार्ग जातो. या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांतून तलावाचे पाणी वाहत असल्याने येथून ये-जा करणाऱ्यांनाही याची झळ सहन करावी लागते. शहराची धरोहर असलेल्या या सरकारी तलावाची योग्यरीत्या जोपासना व सौंदर्यीकरण केल्यास एक आकर्षक स्थळ गोंदियावासीयांना लाभ शकते. मात्र प्रशासनाची उदासीनता या तलावाच्या विकासाच्या आडी येत आहे. परिणामी सरकारी तलाव आपले अस्तित्व गमावू लागला आहे. शिवाय मानवाच्या अतिरेकामुळे तलावात घाण पसरत असून आज परिसरातील नागरिकांना हा तलाव नकोसा होऊ लागला आहे. (शहर प्रतिनिधी)