शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

धानपिकावर गादमाशी, तुडतुड्यासारख्या रोगांचा प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

वामन लांजेवार शेंडा कोयलरी : या परिसरात रोवणीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यामुळे, धानपिकावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. ...

वामन लांजेवार

शेंडा कोयलरी : या परिसरात रोवणीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यामुळे, धानपिकावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. नंतर अतिवृष्टीचा कहर झाल्याने हलक्या प्रतीच्या धानाला व मुख्यत्वे करून हायब्रीडला गादमाशीने ग्रासले आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काही हलक्या प्रतीच्या धानावर तुडतुड्यांचा प्रकोप दिसून येत आहे. किटकनाशकाची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, मसरामटोला, आपकारीटोला, कोहळीपार, पांढरवाणी, कोयलारी, मोहघाटा, उशिखेडा, कन्हारपायली, पाटीलटोला, सालईटोला, प्रधानटोला, नरेटीटोला व पुतळी हा आदिवासीबहुल परिसर असून, या परिसरात शेती हाच या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. सध्या हलक्या प्रतीचे धान निसवले असून, अवघ्या काही दिवसांतच कापणीयोग्य होणार आहे. मात्र पाऊस दररोज बरसत असल्याने आणि ढगाळ वातावरणाने धान पिकावर मावा, तुडतुडा, गादमाशी, खोडकिडासारख्या कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.

......

जड धानावरही संकट

या परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:च्या दैनंदिन उपयोगासाठी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. ते धान सध्या निसवत असून, त्यावरही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागड्या किटकनाशकाची फवारणी करून सुद्धा धानावरील रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याचा परिणाम धानपिकावर होईल. परिणामी, यावर्षीच्या खरीप हंगामातील धान उत्पादनात कमालीची घट होणार असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.

............

शेतकऱ्यांना कर्जफेडीची चिंता

यावर्षी बँकेने बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे नाकारल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. काहींनी उधार उसने करुन धानपिकाची लागवड केली, तेही रोगांच्या प्रादुर्भावाने धोक्यात आले आहे. त्यामुळे परतफेडीचा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेती व्यवसायाला जोड म्हणून या परिसरात एखाद्या छोट्यामोठ्या उद्योग धंद्याची नितांत गरज आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करून लक्ष देण्याची गरज आहे.