शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

विकास कामात होतो भेदभाव

By admin | Updated: February 9, 2015 23:16 IST

प्रभाग क्रमांक १ मधील उर्वरित भागात येणाऱ्या कन्हारटोली, पूणाटोली व न्यू लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांबाबत अनभिज्ञ आहेत. कित्येकांनी

कपिल केकत - गोंदिया प्रभाग क्रमांक १ मधील उर्वरित भागात येणाऱ्या कन्हारटोली, पूणाटोली व न्यू लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांबाबत अनभिज्ञ आहेत. कित्येकांनी तर नगरसेवक दिसतच नसल्याचे सांगितले, तर काहींनी नगरसेवकांनी केवळ स्वत:च्या घराशेजारील परिसराचाच विकास केल्याचेही बोलून दाखविले. नगरसेवक ज्या परिसरात राहतात त्या भागातच कामे झाली असून अन्य परिसरासाठी त्यांच्याकडे वेळच नसल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. नगरसेवकांच्या कारभाराशी संतुष्ट नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथील परिस्थिती बघता त्यांच्या बोलण्यात वास्तवीकता दिसून आली. परिसरात कामे झाली नाहीत असे म्हणता येणार नाही. मात्र जेवढी कामे करायला पाहिजेत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. बांधकाम झाले नाही समजता येते. मात्र सफाईचा मुद्दा येथे गंभीर असून नागरिकांत सफाईला घेऊन चांगलाच रोष खदखदत आहे. अवाढव्य प्रभाग तयार झाल्याने नगरसेवकांनी आपले क्षेत्र वाटून घेतले असल्याचे येथे कानी पडले. क्षेत्र तर वाटण्यात आले मात्र आपल्या क्षेत्राची जबाबदारी पेलण्यात नगरसेवक कुचकामी पडत असल्याचेही चित्र परिसराचा फेरफटका मारला असता दिसले. परिसरात नगरसेवक काम करीत नाही असे बोलता येणार नाही. मात्र कामांच गरज आहे तेथे ते पोहचत नाही. लोकांच्या ऐकून घ्यायला त्यांना वेळच नसल्याचे नागरिक बोलत आहेत. पूणाटोली परिसरात पक्या नाल्यांची स्थिती कच्या नाल्यांपेक्षाही गचाळ आहे. कचरा नाल्यांत पडून आहे मात्र त्याची सफाई करणार कोण. नगरसेवक आपली कामे एकमेकांवर ढकलत असल्याचे कन्हारटोलीतील नागरिकांनी बोलून दाखविले. येथील परिसराची पाहणी केली असता रस्ते पूर्ण खराब झाले आहेत. त्यामुळे धूळीचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील प्लॉट्स कचरापेटीत परिवर्तीत झाले आहेत. सफाईची समस्या आहे ती आहेच. नाल्या सफाई अभावी दुर्गंधी पसरवीत आहेत. पथदिवे आठ दिवस जळतात व त्यानंतर अंधारासोबतच निभवावे लागते असे चित्र आहे. परिसराची परिस्थिती बघता नुकताच हा परिसर नगरपरिषदेने आपल्या हद्दीत घेतला असे वाटते. नगरसेवकांना समस्या सांगावी तर ते ऐकून घेतात व नंतर विसरून जात असल्याचे येथील नागरिक म्हणतात. सफाई म्हटली तर आपली आपल्याचा करावी लागते. अशात पालिका व निवडून दिलेले नगरसेवक मग काय कामाचे असेही बोलले जाते. विशेष म्हणजे नगरसेवक कामांत भेदभाव करतात हा ज्वलंत मुद्दा येथे कानी पडला. नगरसेवक ज्या भागात राहतात त्या भागातच कामे व सफाई होते. आमच्या परिसरात कुणी नसल्याने आम्हाला उघड्यावर टाकण्यात आल्याचे येथील महिला-पुरूषांनी बोलून दाखविले. किमान नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तरी ढुंकून बघण्याची अपेक्षाही येथील नागरिकांनी व्यक्त केली.