शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

तिन्ही हंगामांत पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना परावृत्त करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST

गोंदिया : तालुक्यात असलेल्या सिंचन व्यवस्थेचा योग्य व्यवस्थापन व वापर केला गेला, तर तालुक्यात वर्षात खरीप, रबी व उन्हाळी ...

गोंदिया : तालुक्यात असलेल्या सिंचन व्यवस्थेचा योग्य व्यवस्थापन व वापर केला गेला, तर तालुक्यात वर्षात खरीप, रबी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत शेती केली जाऊ शकते. यासाठी पाटबंधारे विभागाच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर काही गावांची निवड करून शेतकऱ्यांना मुबलक पाणी आणि योग्य मार्गदर्शन करीत तिन्ही हंगामांत शेती करण्यास परावृत्त करा, असा सल्ला आ. विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

गोंदिया तालुक्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच कृषी विभागाच्या कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी पी.पाटील, तालुका कृषी अधिकारी डी. एम. तुमडाम, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, राजू माथुरकर, गोंदिया वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल जयस्वाल, मनोज खोटेले, आर. के. कटरे, बाघ इटियाडोहचे उपविभागीय अभियंता व्ही.व्ही. निगम, महाबीजचे प्रतिनिधी ए.एन. गावंडे, पी.व्ही. कलेवार, डब्ल्यू. टेंभुर्णे उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले रबी पिकात धानव्यतिरिक्त कलिंगड, खरबूज, लाखोळी, तूर, पोपट, जवस, उडीद, हरभरा, वटणा, इत्यादी पिकांचा, तर उन्हाळी पिकात तीळ, करडई, मूग, उडीद आदींचा समावेश करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण तालुक्यात याचे प्रात्यक्षिक करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविली. कृषी अधिकारी तुमडाम यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत काही गावांची निवड करून प्रयोग करण्याचे आश्वासन दिले.

.....

५५०० मेट्रिक टन युरियाची मागणी

दरवर्षी खते आणि बियाणांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून नियोजन करून खरिपासाठी आवश्यक बियाणे व खते आधीच उपलब्ध करून ठेवण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खरिपासाठी धानाचे महाबीजकडे ५५०० क्विंटल, तर खाजगी कंपनीचे ५००० क्विंटल, अशी एकूण १०५०० क्विंटल मागणी केली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली, तर खतांसाठी ५५०० मेट्रिक टन युरिया, तर १६७२६ मेट्रिक टन इतर खतांची मागणी केली आहे.

........

जैविक खतांचा वापर करणाऱ्यावर भर द्या

धान पिकावर सर्वाधिक मावा, तुडतुडा, पतंगा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणून रासायनिक उपचारापेक्षा जैविक उपचार जास्त उपयुक्त असून, यासाठी कामगंध सापळा, निंबोळी अर्क, मेटारायझियम, ट्रायकोकार्ड व जैविक कीटकनाशकांचा वापर सोयीस्कर असल्याचे यांच्या वापरातून निदर्शनात आले आहे, तसेच शेतकऱ्यांना कीड नियंत्रणावर उपाययोजना कशी करता येईल यासाठी वेळोवेळी पत्रकार परिषद, प्रेस नोट, पत्रके यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोग नियंत्रण करण्यासंबंधीच्या सूचना करण्यात आल्या.