शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सलंगटोलावासीय ‘डिसकनेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:11 IST

शासन व प्रशासनातर्फे पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे तयार करुन त्यांना तालुका आणि शहराशी कनेक्ट केले जात असल्याचा दावा केला जात आहे. पण, सडक अर्जुनी तालुक्यातील सलंगटोला येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील लोक तालुका व विकासापासून डिसकनेक्ट असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशासन प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्याअभावी गावकरी सोयी सुविधांपासून दूर

वामन लांजेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : शासन व प्रशासनातर्फे पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे तयार करुन त्यांना तालुका आणि शहराशी कनेक्ट केले जात असल्याचा दावा केला जात आहे. पण, सडक अर्जुनी तालुक्यातील सलंगटोला येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील लोक तालुका व विकासापासून डिसकनेक्ट असल्याचे चित्र आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली (रेंगेपार) ग्रामपंचायत अंतर्गत या गावाचा समावेश आहे. या गावात केवळ आदिवासी समाजाची लोकवस्ती आहे. हे गाव आदिवासी बहुल, नक्षल व अतिदुर्गम भागात येते. त्याची पारंपरिक भाषा गोंडी असून शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात जाण्यासाठी पक्के सोडा कच्चे रस्ते नसल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विकासपासून वंचित राहावे लागत आहे.रस्त्याची सोय नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना शेतामधून ये-जा करावी लागते.गावात शाळा, अंगणवाडी, मोबाईल सेवा, आरोग्य सेवा अशा कुठल्याच सोयी सुविधा सोई नाहीत. ग्रामपंचायतचे सुद्धा या गावाकडे लक्ष नसल्याने गावात समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. येथील गावकरी मुलभूत सोयी सुविधां मुकल्याचे चित्र आहे. गावात जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी येथील गावकºयांनी अनेकदा केली. मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकºयांना अजूनही धुºया पाºयाने व शेतामधून ये-जा करावी लागते.पालकमंत्र्यांना वेळ मिळे नाजिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे सडक अर्जुनी येथीलच रहिवासी आहेत. सलंगटोला हे गाव त्यांच्याच तालुक्यातील असून त्यांच्या निवासस्थानापासून या गावाचे अंतर केवळ ९ कि.मी.चे आहे. मात्र त्यांचे सुध्दा येथील गावकºयांच्या समस्येकडे अद्याप लक्ष गेले नाही. त्यामुळे सलंगटोलावासीयांची समस्या ऐकूण ती मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे बोलल्या जाते.लाखोंचा निधी केवळ नावापुरताचराज्य सरकार दरवर्षी अंदाजपत्रकात आदिवासींच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. त्याचा गाजावाजा सुध्दा शासन आणि प्रशासनाकडून नेहमीच केला जातो. मात्र यानंतरही सलंगटोलासारखे गाव विकासापासून वंचित आहे. गावात जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी विकासासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका जातो कुठे असारुग्णांची गैरसोयसलंगटोला गावातील एखादा व्यक्ती गंभीर आजारी असल्यास त्याला खाटेवरच उचलून नेण्याशिवाय पर्याय नाही. गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहन जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यामुळे बरचेदा रुग्ण दगावल्याच्या घटना सुध्दा घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने यासर्व गोष्टींची गांर्भीयाने दखल घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.२२ मे ला रात्री १२ वाजता आशा वर्कर आशा धुर्वे यांना प्रसुतीच्या वेदना झाल्या. १०८ क्रमांकावर फोन करण्यात आला. मात्र रस्त्याअभावी गाडी आली नाही. शेवटी खासगी वाहन बोलावून त्यांना गावापासून एक कि.मी. अंतरावर खाटेवर न्यावे लागले.- राजेश धुर्वे, (आशाचे पती)...................................गावकऱ्यांची मागणी रास्त आहे. ग्रामपंचायतने रस्ता तयार करण्याचा ठराव घेवून त्याचे काम सुध्दा कंत्राटदाराला दिले आहे. मात्र पावसाळ्याला सुरूवात झाल्याने रस्ताचे काम सुरू झाले नाही.-अशोक ठलाल, सरपंच, ग्रा.पं. दल्ली