शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

सौंदड धान खरेदी केंद्रांवर गैरसोय

By admin | Updated: November 9, 2016 01:48 IST

केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र हंगाम २०१६-१७ करीता सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत सौंदड,

सुख-सुविधांचा अभाव : १६ गावांतील शेतकऱ्यांची लूट थांबवा -अशोक लंजे सौंदड : केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र हंगाम २०१६-१७ करीता सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत सौंदड, बाम्हणी, हेटी, मुरपार, धानोरी, पांढरी येथे तसेच उपप्रादेशिक कार्यालय आदिवासी विभाग नवेगावबांध यांच्या सेवा सहकारी आदिवासी संस्थांमार्फत कनेरी, चिखली, कोहमारा, सडक अर्जुनी, परसोडी, डव्वा, खजरी, दल्ली, डोंगरगाव, कोयलारी या केंद्रावर शासनाच्या आधारभूत धान धरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र या केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी योग्य सुविधा नाही. त्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांची लूट थांबवावी अशी मागणी जि.प.चे माजी कृषी सभापती अशोक लंजे यांनी केली आहे.या धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करताना ईलेक्ट्रानिक वजन काटे उपयोगात आणायला हवे, परंतु जुने साधे काटे (वजन माप) नुतनीकरण न करताच सर्रासपणे शेतकऱ्यांचे धान जास्त प्रमाणात मोजल्या जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासन दरापेक्षा कमी दराने धान्य शेतकऱ्याने व्यापाऱ्यास विकू नये याची खबरदारी घेणे बाजार समितीची आहे. परंतु सर्रासपणे सडक अर्जुनी तालुक्यात व्यापारी शेतकऱ्यांकडून शासनाच्या समर्थन मुल्यापेक्षा कमीदराने खऱ्यावरच धान्य खरेदी करीत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा मार्केटिंग गोंदिया व आदिवासी विभाग नवेगावबांध यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या धान्य केंद्रावर धान्य खरेदीवर शासनाचा ग्रेडर दिसून येत नाही. या केंद्राच्या माध्यमातून बाजार समितीला १ रु.५ पैसे शेष रुपाने मिळते. जवळपास सडक अर्जुनी बाजार समितीला वर्षापोटी २५ लाख पर्यंत उत्पन्न होते. परंतु या शेषच्या उत्पन्नातून प्रत्येक केंद्रावर बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था, टोकण देणे, शेड, आद्रतामापक यंत्र, माहिती फलक, पिण्याचे पाणी व केंद्राशी जोडलेले गाव यादी, इत्यादी व्यवस्था करुन देणे शासन निर्णयानुसार करुन देणे बंधनकारक आहे. बहुतांश केंद्रावर ही सुविधा दिसून येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्याकरिता सुख-सुविधेचा अभाव असून शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी सभापती अशोक लंजे यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)