शहरं
Join us  
Trending Stories
1
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
2
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
3
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
4
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
5
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
6
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
7
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
8
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
9
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
10
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
11
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
12
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
13
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
14
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
15
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
16
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
17
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
18
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
19
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
20
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

सौंदड धान खरेदी केंद्रांवर गैरसोय

By admin | Updated: November 9, 2016 01:48 IST

केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र हंगाम २०१६-१७ करीता सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत सौंदड,

सुख-सुविधांचा अभाव : १६ गावांतील शेतकऱ्यांची लूट थांबवा -अशोक लंजे सौंदड : केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र हंगाम २०१६-१७ करीता सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत सौंदड, बाम्हणी, हेटी, मुरपार, धानोरी, पांढरी येथे तसेच उपप्रादेशिक कार्यालय आदिवासी विभाग नवेगावबांध यांच्या सेवा सहकारी आदिवासी संस्थांमार्फत कनेरी, चिखली, कोहमारा, सडक अर्जुनी, परसोडी, डव्वा, खजरी, दल्ली, डोंगरगाव, कोयलारी या केंद्रावर शासनाच्या आधारभूत धान धरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र या केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी योग्य सुविधा नाही. त्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांची लूट थांबवावी अशी मागणी जि.प.चे माजी कृषी सभापती अशोक लंजे यांनी केली आहे.या धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करताना ईलेक्ट्रानिक वजन काटे उपयोगात आणायला हवे, परंतु जुने साधे काटे (वजन माप) नुतनीकरण न करताच सर्रासपणे शेतकऱ्यांचे धान जास्त प्रमाणात मोजल्या जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासन दरापेक्षा कमी दराने धान्य शेतकऱ्याने व्यापाऱ्यास विकू नये याची खबरदारी घेणे बाजार समितीची आहे. परंतु सर्रासपणे सडक अर्जुनी तालुक्यात व्यापारी शेतकऱ्यांकडून शासनाच्या समर्थन मुल्यापेक्षा कमीदराने खऱ्यावरच धान्य खरेदी करीत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा मार्केटिंग गोंदिया व आदिवासी विभाग नवेगावबांध यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या धान्य केंद्रावर धान्य खरेदीवर शासनाचा ग्रेडर दिसून येत नाही. या केंद्राच्या माध्यमातून बाजार समितीला १ रु.५ पैसे शेष रुपाने मिळते. जवळपास सडक अर्जुनी बाजार समितीला वर्षापोटी २५ लाख पर्यंत उत्पन्न होते. परंतु या शेषच्या उत्पन्नातून प्रत्येक केंद्रावर बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था, टोकण देणे, शेड, आद्रतामापक यंत्र, माहिती फलक, पिण्याचे पाणी व केंद्राशी जोडलेले गाव यादी, इत्यादी व्यवस्था करुन देणे शासन निर्णयानुसार करुन देणे बंधनकारक आहे. बहुतांश केंद्रावर ही सुविधा दिसून येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्याकरिता सुख-सुविधेचा अभाव असून शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी सभापती अशोक लंजे यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)