शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

करुझरी सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:07 IST

तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त संपूर्ण आदिवासी गाव करुझरी गावात ये-जा करण्याकरीता रस्ता नसल्याने हे गाव सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्दे६५ वर्षानंतरी रस्त्याची सोय नाही : शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष, गावकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त संपूर्ण आदिवासी गाव करुझरी गावात ये-जा करण्याकरीता रस्ता नसल्याने हे गाव सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.प्राप्त माहितीनुसार, गट ग्रामपंचायत पळसगाव (चुटिया) अंतर्गत येणाºया करुझरी गावाला ये-जा करण्यासाठी अद्यापही रस्ता नाही. एकीकडे शासन पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करण्याचा दावा करीत आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही करुझरी गाव रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. दरम्यान याची दखल घेत काँग्रेस कमिटीचे महासचिव सहसराम कोरोटे यांनी करुझरी येथे भेट देवून गावातील समस्यांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत पळसगावचे सरपंच फुलवंता बागडेरीया, माजी पं.स. सदस्य व धुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष सोनू नेताम, माजी सभापती वसंत पुराम, उमेश बागडेरीया, धुरसिंग मडावी, ममता कुंभरे, रामहरी नेताम, नामदेव भोयर, रामदास सलामे, मदनलाल ताराम, शामलाल कुंभरे, मंगलू कुंजाम, शिवलाल मडावी, पोलीस पाटील चौधरी, ताराचंद चनाप, मन्साराम कुंभरे, महिला धुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष पुशो ओटी, वच्छला दर्रो, फुलवंता कल्लो व रुकमीनी ताराम उपस्थित होते. याप्रसंगी गावातील लोकांनी गावात जि.प.ची प्राथमिक शाळा आहे. या गावात ये-जा करण्यासाठी केवळ एकच रस्ता असून तो देखील पूर्णपणे अविकसीत आहे. पावसाळ्यात करुझरी नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी विविध अडचणीना तोंड द्यावे लागते. येथे पूल तयार करण्यासाठी शासनाने २०१५-१६ या वित्तीय वर्षात ३३ लाख २९ हजार २०० रुपये निधी मंजूर केला होता. या निधीतून या कामावर अकुशल कामे करण्यात आली. यावर २ लाख ५० हजार रुपये खर्चही झाले. मात्र सध्या स्थितीत या पुलाचे काम सुध्दा बंद आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.सिंचनाच्या सोयीचा अभावकरुझरी येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात सिंचनाच्या सोयी केल्यास शेतकऱ्यांना त्याची मदत होईल.आंदोलन छेडण्याचा इशाराकरुझरी हे गाव स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे या गावातील गैरसोयी दूर करुन हे गाव केव्हा विकासाच्या प्रवाहात येणार असा सवाल सहषराम कोरोटे यांनी शासनाला केला. करुझरी येथे ये-जा करण्यासाठी रस्ता तयार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोरोटे यांनी दिला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी