शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

करुझरी सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:07 IST

तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त संपूर्ण आदिवासी गाव करुझरी गावात ये-जा करण्याकरीता रस्ता नसल्याने हे गाव सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्दे६५ वर्षानंतरी रस्त्याची सोय नाही : शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष, गावकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त संपूर्ण आदिवासी गाव करुझरी गावात ये-जा करण्याकरीता रस्ता नसल्याने हे गाव सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.प्राप्त माहितीनुसार, गट ग्रामपंचायत पळसगाव (चुटिया) अंतर्गत येणाºया करुझरी गावाला ये-जा करण्यासाठी अद्यापही रस्ता नाही. एकीकडे शासन पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करण्याचा दावा करीत आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही करुझरी गाव रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. दरम्यान याची दखल घेत काँग्रेस कमिटीचे महासचिव सहसराम कोरोटे यांनी करुझरी येथे भेट देवून गावातील समस्यांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत पळसगावचे सरपंच फुलवंता बागडेरीया, माजी पं.स. सदस्य व धुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष सोनू नेताम, माजी सभापती वसंत पुराम, उमेश बागडेरीया, धुरसिंग मडावी, ममता कुंभरे, रामहरी नेताम, नामदेव भोयर, रामदास सलामे, मदनलाल ताराम, शामलाल कुंभरे, मंगलू कुंजाम, शिवलाल मडावी, पोलीस पाटील चौधरी, ताराचंद चनाप, मन्साराम कुंभरे, महिला धुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष पुशो ओटी, वच्छला दर्रो, फुलवंता कल्लो व रुकमीनी ताराम उपस्थित होते. याप्रसंगी गावातील लोकांनी गावात जि.प.ची प्राथमिक शाळा आहे. या गावात ये-जा करण्यासाठी केवळ एकच रस्ता असून तो देखील पूर्णपणे अविकसीत आहे. पावसाळ्यात करुझरी नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी विविध अडचणीना तोंड द्यावे लागते. येथे पूल तयार करण्यासाठी शासनाने २०१५-१६ या वित्तीय वर्षात ३३ लाख २९ हजार २०० रुपये निधी मंजूर केला होता. या निधीतून या कामावर अकुशल कामे करण्यात आली. यावर २ लाख ५० हजार रुपये खर्चही झाले. मात्र सध्या स्थितीत या पुलाचे काम सुध्दा बंद आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.सिंचनाच्या सोयीचा अभावकरुझरी येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात सिंचनाच्या सोयी केल्यास शेतकऱ्यांना त्याची मदत होईल.आंदोलन छेडण्याचा इशाराकरुझरी हे गाव स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे या गावातील गैरसोयी दूर करुन हे गाव केव्हा विकासाच्या प्रवाहात येणार असा सवाल सहषराम कोरोटे यांनी शासनाला केला. करुझरी येथे ये-जा करण्यासाठी रस्ता तयार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोरोटे यांनी दिला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी