शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

नागरिकांशी थेट संपर्क

By admin | Updated: May 30, 2017 00:59 IST

आ. विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

संवाद शिवार यात्रा : आमदारांनी साधला कृषीविषयक बाबींवर संवादलोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : आ. विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जलयुक्त शिवार, शेतीसंबंधी कृषी निविष्ठा व दर्जेदार बी-बियाण्यांचा वापर पुरविणे, कृषी कर्ज व पीक विमा आदी विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला. भाजप सरकारने ‘शाश्वत शेती-समृध्द शेतकरी’ तसेच बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी योग्य पाऊल उचलले आहे. यासोबतच विविध विषयांवर चर्चा करीत गावाच्या समस्या निकाली काढून गाव विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावे, असे मत आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, संघटन महामंत्री बाळा अंजनकर, चिंतामन रहांगडाले, सभापती छाया दसरे, नगरध्यक्ष अशोक इंगळे, धानेंद्र अटरे, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे, सरपंच सुरेश पटले, अजाब रिनाईत, महेंद्र बघेले, उपविभागीय अधिकारी वालस्कर, तहसीलदार रवींद्र चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर तसेच शेतकरी-शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. विजय रहांगडाले शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, कर्जमाफी संदर्भात भाजप सरकारकडून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. शेतीचे उत्पादन खर्च कमी करून व शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुढील काळात ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. शेतकरी बांधवांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. तसेच पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले.ते पुढे म्हणाले, मतदारसंघात जलयुक्त शिवार अभियानातून मोठी विकास कामे झाली असून आपणही भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मतदारसंघात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून भूजल पातळी वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. एक पीक घेणारा शेतकरी दुबार पीक घेत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळील नाले, बंधारे यांचे खोलीकरण झाले की नाही याची खात्री करून घ्यावी. यंदाच्या खरीप हंगामासाठी धान बियाणांसह अन्य बियाणांचा पर्याप्त साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. खताचीही कुठलीही कमतरता खरीप हंगामात जाणवणार नाही, याची काळजी सराकरने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता न करता खरीप हंगामाला सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.