शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

नागरिकांशी थेट संपर्क

By admin | Updated: May 30, 2017 00:59 IST

आ. विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

संवाद शिवार यात्रा : आमदारांनी साधला कृषीविषयक बाबींवर संवादलोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : आ. विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जलयुक्त शिवार, शेतीसंबंधी कृषी निविष्ठा व दर्जेदार बी-बियाण्यांचा वापर पुरविणे, कृषी कर्ज व पीक विमा आदी विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला. भाजप सरकारने ‘शाश्वत शेती-समृध्द शेतकरी’ तसेच बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी योग्य पाऊल उचलले आहे. यासोबतच विविध विषयांवर चर्चा करीत गावाच्या समस्या निकाली काढून गाव विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावे, असे मत आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, संघटन महामंत्री बाळा अंजनकर, चिंतामन रहांगडाले, सभापती छाया दसरे, नगरध्यक्ष अशोक इंगळे, धानेंद्र अटरे, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे, सरपंच सुरेश पटले, अजाब रिनाईत, महेंद्र बघेले, उपविभागीय अधिकारी वालस्कर, तहसीलदार रवींद्र चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर तसेच शेतकरी-शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. विजय रहांगडाले शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, कर्जमाफी संदर्भात भाजप सरकारकडून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. शेतीचे उत्पादन खर्च कमी करून व शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुढील काळात ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. शेतकरी बांधवांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. तसेच पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले.ते पुढे म्हणाले, मतदारसंघात जलयुक्त शिवार अभियानातून मोठी विकास कामे झाली असून आपणही भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मतदारसंघात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून भूजल पातळी वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. एक पीक घेणारा शेतकरी दुबार पीक घेत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळील नाले, बंधारे यांचे खोलीकरण झाले की नाही याची खात्री करून घ्यावी. यंदाच्या खरीप हंगामासाठी धान बियाणांसह अन्य बियाणांचा पर्याप्त साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. खताचीही कुठलीही कमतरता खरीप हंगामात जाणवणार नाही, याची काळजी सराकरने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता न करता खरीप हंगामाला सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.