शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांशी थेट संपर्क

By admin | Updated: May 30, 2017 00:59 IST

आ. विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

संवाद शिवार यात्रा : आमदारांनी साधला कृषीविषयक बाबींवर संवादलोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : आ. विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जलयुक्त शिवार, शेतीसंबंधी कृषी निविष्ठा व दर्जेदार बी-बियाण्यांचा वापर पुरविणे, कृषी कर्ज व पीक विमा आदी विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला. भाजप सरकारने ‘शाश्वत शेती-समृध्द शेतकरी’ तसेच बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी योग्य पाऊल उचलले आहे. यासोबतच विविध विषयांवर चर्चा करीत गावाच्या समस्या निकाली काढून गाव विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावे, असे मत आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, संघटन महामंत्री बाळा अंजनकर, चिंतामन रहांगडाले, सभापती छाया दसरे, नगरध्यक्ष अशोक इंगळे, धानेंद्र अटरे, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे, सरपंच सुरेश पटले, अजाब रिनाईत, महेंद्र बघेले, उपविभागीय अधिकारी वालस्कर, तहसीलदार रवींद्र चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर तसेच शेतकरी-शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. विजय रहांगडाले शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, कर्जमाफी संदर्भात भाजप सरकारकडून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. शेतीचे उत्पादन खर्च कमी करून व शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुढील काळात ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. शेतकरी बांधवांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. तसेच पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले.ते पुढे म्हणाले, मतदारसंघात जलयुक्त शिवार अभियानातून मोठी विकास कामे झाली असून आपणही भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मतदारसंघात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून भूजल पातळी वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. एक पीक घेणारा शेतकरी दुबार पीक घेत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळील नाले, बंधारे यांचे खोलीकरण झाले की नाही याची खात्री करून घ्यावी. यंदाच्या खरीप हंगामासाठी धान बियाणांसह अन्य बियाणांचा पर्याप्त साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. खताचीही कुठलीही कमतरता खरीप हंगामात जाणवणार नाही, याची काळजी सराकरने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता न करता खरीप हंगामाला सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.