शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जीर्ण इमारती बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:41 IST

मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला.जीर्ण इमारतींमुळे घडलेल्या या घटनांनी नागरिकांचे नाहक बळी जात असताना गोंदिया नगर परिषदेलाही अशाच अपघातांची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देनगर परिषदेला अपघातांची प्रतीक्षा : फक्त नोटीस बजावून हातवर

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला.जीर्ण इमारतींमुळे घडलेल्या या घटनांनी नागरिकांचे नाहक बळी जात असताना गोंदिया नगर परिषदेलाही अशाच अपघातांची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. शहरात १३७ इमारती जीर्ण असल्याची आकडेवारी असताना मात्र नगर परिषद त्यांना केवळ नोटीस बजावून मोकळी झाली आहे. मात्र या इमारतींचे पुढे काय याबाबत कुणीही काहीच बोलायला तयार नाही.जीर्ण इमारती पडून जिवीतहानी झाल्याच्या घटना ताज्या आहेत. अशा घटना पावसाळ््यात जास्त प्रमाणात घडतात.शहरातही असे काहीसे प्रकार घडले आहेत. असे प्रकार घडू नये व जीर्ण इमारती पडून कुणाचा जीव जाऊ नये याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर असते. नगर परिषदेला यासाठी विभाग निहाय पथक तयार करून जीर्ण इमारतींची माहिती संकलीत करावयाची असते. तसेच अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजाविण्याचे,शिवाय गरज पडल्यास धोकादायक बांधकाम पाडण्याची कारवाई करावी लागते.जीर्ण इमारतींचा हा धोका मुख्यत्वे पावसाळ््यात उद्भवत असल्याने शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण केले जाते.विशेष म्हणजे, नगर परिषदेला याचा चांगलाच अनुभव असून नगर परिषदेचा एक जीर्ण भाग यापूर्वी पडला आहे. यातूनच यंदा नगर परिषदेने कर विभागाकडून शहरातील जीर्ण इमारतींची यादी तयार करवून घेतली.त्यानुसार मोहरीरनी शहरातील १३७ जीर्ण इमारतींची यादी तयार करून नगर रचना विभागाला दिली आहे. या यादीच्या आधारे नगर रचना विभागाने संबंधीत मालमत्ता धारकांना नोटीस बजावले आहे.विशेष म्हणजे, जीर्ण इमारत पडून त्यातून काही धोका निर्माण होत असल्यास नगर परिषद मालमत्ताधारकास नोटीस बजावून त्यांना जीर्ण इमारत पाडण्यास सांगते. त्यांच्याकडून इमारत न पाडल्यास नगर परिषद ती जीर्ण इमारत पाडू शकते अशी अधिनियमांत तरतूद असल्याची माहिती आहे.त्यानुसार, नगर परिषदेने या मालमत्ता धारकांना ३१ मे ते १० जून या कालावधीत नोटीस बजावले आहे. त्यानंतर मात्र आता पुढे काय याबाबत कुणाही काहीच बोलायला तयार नाही.स्ट्रक्चरल आॅडिट झालेच नाहीनगर परिषदेने सन २०१८-१९ या वर्षात १८१ इमारतींच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. तर सन २०१९-२० मध्ये अतापर्यंत ८५ बांधकामांना मंजुरी दिल्याची माहिती आहे. असे असतानाही या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट झालेले नाही. अशात या इमारती नगर परिषदेला देण्यात आलेल्या नकाशानुसार तयार होत आहेत किंवा नाही दे कळायला मार्ग नाही.शिवाय इमारतींमध्ये अग्निशमन व्यवस्था, पार्कींग यासह अन्य आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली की नाही हे सुद्धा नगर परिषदेला माहिती नाही. अशात नियमांना तोडून बांधकाम केले जाणार यात शंका नाही.तरतूद असतानाही कारवाई नाहीजीर्ण इमारतींपासून धोका दिसत असल्यास अशा इमारतींना पाडण्यासाठी नगर रचना विभागाकडून संबंधित मालमत्ताधारकाला नोटीस बजावून त्या इमारतीला पाडणे किंवा सुरक्षीत करण्यास सांगीतले जाते. संबंधितांकडून जर काहीच केले जात नसल्यास अशा इमारतींना नगर परिषद पाडून संबंधितांकडून झालेला खर्च वसुल करू शकते अशी तरतूद आहे.येथे मात्र नगर रचना विभागाकडून नोटीस बजावून धन्यता मानली जाते. पुढे काहीच कारवाई केली जात नसल्याने ही धोकादायक बाब ठरत आहे.नगर परिषदेची भूमिकागोंदिया शहरात नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात १३७ इमारती जीर्ण झाल्याचे आढळले. संबंधित इमारत मालकांना जीर्ण बांधकाम पाडण्याची नोटीस बजाविली आहे. नोटीसनंतरही स्वत:हून इमारत न पाडल्यास नगर परिषद अंतर्गत जीर्ण इमारती पाडण्यात येतील.- चंदन पाटील, मुख्याधिकारी