शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

विद्यार्थ्यांनाही डिजिटल करा

By admin | Updated: May 6, 2017 00:55 IST

डिजिटल इंडिया संकल्पनेतून सध्या ई-सुविधेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. यामध्ये शाळांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे.

विजय रहांगडाले : प्रवेशद्वारे व मूर्ती लोकार्पण कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : डिजिटल इंडिया संकल्पनेतून सध्या ई-सुविधेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. यामध्ये शाळांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात बहुतांश शाळा डिजिटल झालेल्या आहेत. परंतु नुसती शाळा डिजिटल होणे गरजेचे नसून त्याबरोबर विद्यार्थीसुद्धा डिजिटल होणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक शिक्षकाला संगणक हाताळता येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले. तलुक्यातील ग्राम मुंडीपार येथे प्रवेशद्वार व शारदादेवीच्या मूर्ती लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार रहांगडाले यांनी, ई लर्निंगमुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या वेळेची बचत होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची संकल्पना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याकरिता प्रत्येक शिक्षकाने आपल्या अध्यापन कार्यात संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाविषयी अभिरुची निर्माण करावी असे मत व्यक्त केले. माजी आमदार भजनदास वैद्य यांनी, मराठी ही आपली मातृभाषा असून मराठी भाषेची अस्मिता टिकवून ठेवण्याकरिता विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रवेशद्वार व मूर्ती दानदाते सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष मुन्नीलाल चौधरी, माजी आमदार भजनदास वैद्य, कृउबास मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ. वसंत भगत, पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, गटशिक्षणाधिकारी मानकर, विस्तार अधिकारी समरीत, माजी संचालक प्रभा घरजारे, सरपंच शीला साठवणे, उपसरपंच आनंद उके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल चौधरी, पोलीस पाटील साठवणे, भाजप महामंत्री डिलेश पारधी, ग्रा.पं. सदस्य सेलोकर, गजभिये, मुख्याध्यापक मनोहर पटले व मोठ्या संख्येने गावकरी, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन आर.पी. भगत यांनी केले. आभार यू.जे. पारधी यांनी मानले.