शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

धापेवाडा उपसा सिंचन टप्पा- २चे पाणी मार्च २०२२ पर्यंत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:32 IST

तिरोडा : आमदार विजय रहांगडाले यांनी धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रमांक २चे पाणी चोरखमारा, बोदलकसा, रिसाळा, भदभद्या व संग्रामपूर ...

तिरोडा : आमदार विजय रहांगडाले यांनी धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रमांक २चे पाणी चोरखमारा, बोदलकसा, रिसाळा, भदभद्या व संग्रामपूर या जलाशयात पाईपलाईनद्वारे सोडण्याच्या कामाकरिता २९० कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करवून घेतले. आजघडीला ९० टक्के काम पूर्ण झाले असून, मार्च २०२२पर्यंत लाभ क्षेत्राअंतर्गत शेतकऱ्यांना पाणी देण्याकरिता कामाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला.

त्यामध्ये प्रामुख्याने एकत्रित कामांपैकी बोदलकसा व सर्रा पाईपलाईन ० ते ८५१० मीटरपैकी रेल्वे ओलांडणीच्या जागी १०० मीटर, लोधीटोला गावाजवळ ४२० मीटर तसेच बोदलकसा पाईपलाईनच्या सुकडी गावाजवळ १२०० मीटर काम बाकी आहे. तसेच टप्पा- २ कार्यान्वित करण्याकरिता आणखी ८५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अंकुर कापसे यांनी दिली. हे काम जून २०२१ पर्यंत मान्सूनपूर्व करण्याचे निर्देश आमदार रहांगडाले यांनी दिले आहेत. तसेच पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करण्याकरिता गुमडोह तलावात पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याकरिता कामाला लागण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

तसेच शेतकऱ्यांना सिंचनविषयक सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता सदैव कटिबद्ध असून, निमगाव प्रकल्पाचे कामसुद्धा दिवाळीनंतर सुरू होणार असल्याची माहिती आमदार रहांगडाले यांनी दिली. आढावा बैठकीत प्रामुख्याने अधीक्षक अभियंता जे. डी. टाले, कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, उपअभियंता पंकज गेडाम, के. एस. मुनगीनवार, कनिष्ठ अभियंता आर. आर. देशमुख उपस्थित होते.