शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

धानाला आघाडी सरकारनेच दिली सर्वाधिक भाववाढ

By admin | Updated: June 29, 2015 01:19 IST

आपण शेतकऱ्यांच्या कसे हिताचे आहोत हे दाखविण्याचे नाटक करून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची चक्क दिशाभूल केली आहे.

मोदी सरकारकडून दिशाभूल : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा घणाघातगोंदिया : आपण शेतकऱ्यांच्या कसे हिताचे आहोत हे दाखविण्याचे नाटक करून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची चक्क दिशाभूल केली आहे. धान उत्पादकांना गेल्या दोन वर्षांपासून फक्त ५० रुपये भाववाढ देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. याउलट आघाडी सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण शेतकऱ्यांच्या धानाला ६० ते १७० रुपयांपर्यंत भाववाढ मिळवून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे कोण, आम्ही की, स्वत:ला भूमिपूत्र म्हणविणारे खोटारडे नेते, हे शेतकऱ्यांनीच ठरवावे, असा घणाघात खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांची ही व्यथा मांडली. खा.पटेल म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याची आणि शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त हमीभाव देण्याची ग्वाही देत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने सलग दुसऱ्या वर्षीही धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये वाढ दिली आहे. गेल्या सहा वर्षातील धानाच्या हमीभावात झालेल्या भाववाढीचा विचार केल्यास भाजप सरकारच्या काळात सलग दुसऱ्या वर्षी दिलेली भाववाढही सर्वात कमी भाववाढ ठरली आहे. आम्ही सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांशी बोलून धानाला १७० रुपयापर्यंत भाववाढ दिली. याशिवाय धानाला बोनस देण्याचा देण्याचा निर्णयही आमच्याच सरकारने सर्वप्रथम घेतला होता, असे खा.पटेल यांनी सांगितले. एकीकडे उत्पादनाचा खर्च वाढत आहे. बियाणे, कीटकनाशकांच्या किमतीसह मजुरीचे दर वाढत आहेत. मात्र त्या तुलनेत हमीभावात अपेक्षित भाववाढ केल्या जात नाही. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना बोनसचे गाजर दाखविले आहे. पण पुढील वर्षी हा बोनसही मिळणार नाही. ही धान उत्पादकांची फसवणूकच आहे, असा आरोप खा.पटेल यांनी केला.२०११-१२ या हंगामात धानाचे भाव (जनरल ग्रेड) प्रतिक्विंटल १०८० रुपये होते. २०१२-१३ मध्ये त्यात १७० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर २०१३-१४ मध्ये त्यात ६० रुपये प्रतिक्विंटल भाववाढ करण्यात आली. मात्र त्या हंगामात २०० रुपये प्रतिक्विंटल बोनस मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. आघाडी सरकारचे ते सत्तेतील शेवटचे वर्ष होते. मात्र गेल्यावर्षी २०१४-१५ मध्ये सत्ताबदल झाला. भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. हे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर धानाची पहिलीच भाववाढ त्यांनी अवघी ५० रुपये केली. त्यामुळे धानाला २०१४-१५ या हंगामात १३६० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव मिळाला. आता धान उत्पादक गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आपल्याला माफ करणार नाही, हे पाहून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून २५० रुपये बोनस देण्याचे गाजर भाजप सरकारने दाखविले आहे. पण ही कायमस्वरूपी दरवाढ नाही. त्यामुळे पुढील वर्षी हा बोनस काढून पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूकच केली जाणार, असा दावा खा.पटेल यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस करणार आंदोलनआता वर्ष २०१५-१६ च्या नवीन खरीप हंगामासाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने जाहीर केलेल्या धानाच्या हमीभावात पुन्हा एकदा केवळ ५० रुपये भाववाढ केली. आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षात असताना ३ हजार रुपये भाव देण्याची मागणी करणारे जिल्ह्याचे विद्यमान खासदार आता आपल्याच सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असताना कुठे गायब झाले, असा प्रश्नही खा.प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. निवडणूक होताच याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिला.