शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

धम्मगिरी बौद्ध धम्माच्या प्रसाराचे केंद्र ठरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:23 IST

संपूर्ण मानव कल्याणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिला. जगाला तारण्यासाठी बुद्धाच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी धम्मगिरीतून समाजबांधवांचा शैक्षणिक, सांस्कृतीक व धार्मिक विकास साधण्यासाठी तसे कार्यक्रम व उपक्रम राबविले पाहिजे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : आंतरराज्यीय धम्मसंमेलन परिचर्चा व समारोप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : संपूर्ण मानव कल्याणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिला. जगाला तारण्यासाठी बुद्धाच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी धम्मगिरीतून समाजबांधवांचा शैक्षणिक, सांस्कृतीक व धार्मिक विकास साधण्यासाठी तसे कार्यक्रम व उपक्रम राबविले पाहिजे. अशा धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने धम्मगिरी या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले.बुद्ध धम्माचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी त्रिपाठक या पाली भाषेतील ग्रंथाचे भाषांतर कार्य राज्य शासनाने सुरु केले आहे. तेव्हा धम्मगिरी हे बौद्ध धम्माच्या प्रसाराचे एक सांस्कृतिक केंद्र ठरावे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.येथील धम्मगिरी परिसरात लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने आयोजित आंतरराज्यीय बौद्ध धम्म संमेलन धम्मपरिचर्चा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व सत्कारमुर्ती म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूरचे अशोक सरस्वती होते. मार्गदर्शक म्हणून नागपूरचे प्रा.घनश्याम धाबर्डे, बनवणे, तनूजा झिलपे, दिल्लीचे सुनील रामटेके तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार साहेबराव राठोड, आर.एन. रावते, मनोहर कोटांगले, भरत वाघमारे, ललीतकुमार खोब्रागडे, बी.जी. बुलाखे, फटिंग आदी उपस्थित होते.याप्रसंगी सरस्वती यांनी, बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म असून त्याचा प्रसार व प्रचार नि:स्वार्थ भावनेतून करण्याची गरज आहे. त्यासाठी अनेक संघटनांद्वारे होत असलेले कार्य पूर्ण संघटनांच्या समन्वयातून केल्यास मजबूत व यशस्वी संघटन निर्माण करता येईल असे मत व्यक्त केले. समारोप कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप बन्सोड होते. प्रमुख पाहुणे डॉ. मोहनलाल पाटील, रेशम भोयर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, यादव मेश्राम, पंचायत समिती सभापती वंदना बोरकर, पंचायत समिती सदस्य छबू उके आदी उपस्थित होते.पालकमंत्री व वाहने दाम्पत्याचा सत्कारया कार्यक्रमात समितीच्यावतीने नामदार राजकुमार बडोले यांचा स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गोंदियाचा जतिन वहाणे रशियात वास्तव्यास असलेला जगातील पहिला कनिष्ठ वैज्ञानीत ठरला. याबद्दल त्याच्या आई-वडिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.