शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धाबेटेकडीला वनग्रामचा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार

By admin | Updated: July 29, 2016 01:50 IST

संत तुकाराम वनग्राम योजनेत तृतीय राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्यातील धाबेटेकडी (आदर्श) या गावाला प्राप्त झाला आहे.

उत्कृष्ट कार्याचे फलित : उपवनसंरक्षकांनी केला समितीचा सत्कार अर्जुनी-मोरगाव : संत तुकाराम वनग्राम योजनेत तृतीय राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्यातील धाबेटेकडी (आदर्श) या गावाला प्राप्त झाला आहे. यानिमित्त वन क्षेत्र अर्जुनी-मोरगावतर्फे धाबेटेकडीच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचा परिविक्षाधिन उप वन संरक्षक राहूल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वन व्यवस्थापन समितीने सहवनक्षेत्र धाबेटेकडी येथील राखीव वन कक्ष क्रमाक २६८ मधील ४०३.०७० हेक्टर जागेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वन समितीतर्फे सहवनक्षेत्र परिसर व गावात वनीकरण, मृद व जलसंपादण, वनसंरक्षण, वन वणवा प्रतिबंधक उपाय, वनक्षेत्रावरील अतिक्रमास प्रतिबंध, अवैध चराईस प्रतिबंध, वन्य पशू पक्षी संरक्षण, पाणवठे, श्रमदान, महिला-पुरूषांचा सहभाग, नवेत्तर पर्यायी इंधनाचा वापर, अभिलेख, नवसंकल्पना व जनजागृती इत्यादी कार्यांची काटेकोरपणए अंंमलबजावणी केली. यानिमित्त वन विभागाच्यावतीने समितीचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी परिविक्षाधिन उप वन संरक्षक राहूल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच नुतनलाल सोनवाने, उपाध्यक्ष महादेव रामटेके, सुरेंद्र ठवरे, ओमप्रकाशसिंह पवार उपस्थित होते. धाबेटेकडी या गावाला वनग्राम म्हणून मिळालेला बहूमान हे गावकऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. वनग्राम योजनेत मिळालेला पुरस्कार ही गौरवाची बाब आहे. आगामी काळात जोमाने कार्य करून राज्यात प्रथम येण्चा संकल्प गावकऱ्यांनी करावा वनविभाग सदैव गावकऱ्यांच्या पाठिशी राहील असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. संचालन करून प्रास्तावीक क्षेत्रसहायक पी.के.ब्राम्हणकर यांनी केले. आभार वनरक्षक प्रवीण केळवतकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी वनरक्षक नागपूरे, सुलाखे, शहारे, राऊत यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सत्कार सन २०१४-१५ या वर्षातील हा पुरस्कार असून वनग्रामचा पुरस्कार पटकाविणारे धाबेटेकडी हे जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे. विशेष म्हणजे नागपूर येथे शुक्रवारी (दि.२९) पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला जात असून धाबेटेकडी वन व्यवस्थापन समितीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. दीड लाख रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.