शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बिरसी विमानतळ प्रकल्पातून डीजीआर रद्द ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST

गोंदिया : डीजीआर (सैनिक पुनर्वसन) रद्द करून कामावर घेण्याच्या मागणीसाठी मागील २ महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या बिरसीवासियांच्या आंदोलनाचे ...

गोंदिया : डीजीआर (सैनिक पुनर्वसन) रद्द करून कामावर घेण्याच्या मागणीसाठी मागील २ महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या बिरसीवासियांच्या आंदोलनाचे फलित झाले आहे. बिरसी विमानतळ प्रकल्पातून आता डीजीआर पूर्णपणे रद्द करण्यात आल्यामुळे स्थानिकांना सुरक्षारक्षक म्हणून कामावर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील १३ वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या स्थानिक सुरक्षारक्षकांना डीजीआरचा अवलंब करत विमानतळ प्रशासनाने कामावरून पूर्णतः बंद केले होते. आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे यासाठी सुरक्षारक्षकांनी मागील २ महिन्यांपासून विमानतळाच्या गेटसमोर आपल्या कुटुंबासह आंदोलनाला सुरुवात केली होती. आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्यांनी स्थानिक संघटनांपासून तर आमदार, खासदार तसेच केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केला होता. तसेच महामहिम राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी केली होती. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने हा प्रश्न तत्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. तर अन्यायग्रस्त सुरक्षारक्षकांना न्याय मिळावा म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील मेंढे, आमदार विनोद अग्रवाल यांनी हा प्रश्न दिल्ली दरबारी उचलून धरला होता. अखेर या विमानतळ प्रकल्पातून डीजीआर कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर सध्या सुरू असलेला डीजीआर प्रायोजित सुरक्षा कंत्राट सुद्धा रद्द करण्यात आले अशी माहिती रिसेटलमेंट विभागाकडून देण्यात आली आहे. स्थानिक सुरक्षारक्षकांना पुन्हा कामावर घेण्यासाठी डीजीआरची मोठी अडचण होती. विमानतळ प्रशासनाद्वारे सुद्धा याच डीजीआरचा उपयोग करीत स्थानिक नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत होता. आता या विमानतळ प्रकल्पातून डीजीआर रद्द झाल्यामुळे कामावरून कमी करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना कामावर परत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता विमानतळ प्रशासन किती दिवसात या कामगारांना पुन्हा कामावर रूजू करुन घेते याकडे लक्ष लागले आहे.

---------------------

प्रतिक्रिया---

डीजीआर रद्द करावा ही आमच्यासाठी व प्रकल्प बाधित गावांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यासाठी आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील सर्व संघटना व जिल्हा प्रशासनाचे आभार. मात्र जोपर्यंत आम्हाला पुन्हा कामावर घेण्यात येत नाही तोपर्यंत आमची ही लढाई सुरूच राहणार.

-पंकज वंजारी

महासचिव, विशाल सुरक्षा कंत्राटी मजदूर संघटना.