शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीमुळे वाढतो पुण्यसंचय

By admin | Updated: February 7, 2017 01:00 IST

भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात.

कानिफनाथ महाराज : प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रमअर्जुनी मोरगाव : भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात. हरिनामामध्ये प्राबल्य आहे. प्राबल्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकतो. यासाठी भक्ती करा व जीवन सुखमय बनवा, असे प्रतिपादन जगतगुरु नरेंद्र महाराज यांचे वारसदार कानिफनाथ महाराज यांनी केले.ते येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, जो रंजल्यागांजल्यांची सेवा करतो, जिथे तुझा आणि माझा असा भेदभाव नसतो तिथेच ईश्वर आपले अस्तित्व निर्माण करतो. प्रत्येकाच्या जीवनात दु:ख येतात. मात्र या दु:खाला माणूसच कारणीभूत असतो. माणसाचे विचार, आचरण पवित्र असले पाहिजे. ईश्वर सांगतो आतातरी जागे व्हा. मुनष्य झोपी गेलेला असतो तेव्हा कान व डोळे उघडे असतात. परंतु अंतर्मनातला माणूस झोपलेला असतो. माणसाचं काम प्रेम देणं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं आहे. माणूस निस्वार्थ भावनेने जगला पाहिजे, पण असे घडत नाही. याचाच अर्थ आपण अद्याप मनातून जागे झालेलो नाही. ज्याने जीवनाच्या केंद्रबिंदूला घट्ट मिठी मारली तो आमिष, वासना व स्वार्थाला बळी पडत नाही. आपण ज्याला माझं म्हणतो ते आपलं नाही. तरी सुद्धा माणूस आमिषाला बळी पडतो व नुकसान होते. माणसाने ज्या गोष्टीला माझं म्हटलं आहे तिथेच प्रश्न निर्माण होतात व दु:ख वाट्याला येते. माया जीवनात आनंद देते. पण तेवढेच दु:खही देते. ज्यावेळी माणसात भ्रम, अहंकार निर्माण होतो, तेव्हा मनुष्य बुडतो. मायेची माणसाला नशा येते. बुद्धीला भ्रम पडतो. यातून बाहेर पडण्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान आपल्या मनात बिंबवणं गरजेचं आहे. मग ईश्वर कुठे आहे. कलियुगात ईश्वर मंदिरात नाही, तो संतामध्ये आहे. त्याला ओळखण्याची पात्रता माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे. कलियुगात देवाने संतामध्येच देवत्व निर्माण केले आहे. स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतू नका. वैऱ्याशीही चांगले वागा. चांगले कर्म व आचरण केल्याने जीवनमान उंचावता येते. भक्तीमुळे पुण्य वाढते. पुण्य वाढले की मागच्या काळातील दुष्कर्म संपुष्टात येतात. मनाचे सामर्थ्य वाढले की उद्भवलेल्या प्रसंगात काय निर्णय घ्यायचा, कर्म कसे करायचे हे आपोआप सुचते. यासाठी दररोज भक्ती केली पाहिजे. सद्गुरु म्हणजे भक्तीची बँक आहे. सद्गुरुवर विश्वास ठेवा, तो तुमच्या पाठीशी उभा राहील. जोवर तुमच्यात अहंकार आहे तोवर देवाचा अनुभव येणार नाही. माणसाच्या मनात प्रचंड ऊर्जा, ताकद आहे. मन रिकामं राहीलं तर सैरावैरा पळतं. यासाठी मनाला काबूत ठेवणं गरजेचं आहे. मनावर संयम नसला तर वाईट घडतं. मन विक्षिप्त झालं, संस्काराला सोडून वागायला लागलं तर जीवनात दु:ख, त्रास होतो. जीवनाची दुर्दशा होते. अपयश व नैराश्य येते. माणसाचं मन माणसाला राजा व भिकारीही बनवू शकतं. यशामुळे माणसाचा अहंकार वाढतो व अहंकारातून माणूस संपतो. त्यासाठी अहंकार बाळगू नका, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी माजी आ. रामरतन राऊत, नगराध्यक्षा पौर्णिमा शहारे, जि.प.च्या बांधकाम व अर्थ समिती सभापती रचना गहाणे, शिव शर्मा, उमाकांत ढेंगे, विजय कापगते, संज़य ठाकरे, दीपक गुप्ता, हर्षल मोदी, प्रकाश गहाणे, अशोक चांडक, गिरीष पालीवाल उपस्थित होते. संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत २५ निराधार महिलांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे १० हजार दर्शनार्र्थींनी हजेरी लावली. (तालुका प्रतिनिधी)