शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

भक्तीमुळे वाढतो पुण्यसंचय

By admin | Updated: February 7, 2017 01:00 IST

भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात.

कानिफनाथ महाराज : प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रमअर्जुनी मोरगाव : भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात. हरिनामामध्ये प्राबल्य आहे. प्राबल्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकतो. यासाठी भक्ती करा व जीवन सुखमय बनवा, असे प्रतिपादन जगतगुरु नरेंद्र महाराज यांचे वारसदार कानिफनाथ महाराज यांनी केले.ते येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, जो रंजल्यागांजल्यांची सेवा करतो, जिथे तुझा आणि माझा असा भेदभाव नसतो तिथेच ईश्वर आपले अस्तित्व निर्माण करतो. प्रत्येकाच्या जीवनात दु:ख येतात. मात्र या दु:खाला माणूसच कारणीभूत असतो. माणसाचे विचार, आचरण पवित्र असले पाहिजे. ईश्वर सांगतो आतातरी जागे व्हा. मुनष्य झोपी गेलेला असतो तेव्हा कान व डोळे उघडे असतात. परंतु अंतर्मनातला माणूस झोपलेला असतो. माणसाचं काम प्रेम देणं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं आहे. माणूस निस्वार्थ भावनेने जगला पाहिजे, पण असे घडत नाही. याचाच अर्थ आपण अद्याप मनातून जागे झालेलो नाही. ज्याने जीवनाच्या केंद्रबिंदूला घट्ट मिठी मारली तो आमिष, वासना व स्वार्थाला बळी पडत नाही. आपण ज्याला माझं म्हणतो ते आपलं नाही. तरी सुद्धा माणूस आमिषाला बळी पडतो व नुकसान होते. माणसाने ज्या गोष्टीला माझं म्हटलं आहे तिथेच प्रश्न निर्माण होतात व दु:ख वाट्याला येते. माया जीवनात आनंद देते. पण तेवढेच दु:खही देते. ज्यावेळी माणसात भ्रम, अहंकार निर्माण होतो, तेव्हा मनुष्य बुडतो. मायेची माणसाला नशा येते. बुद्धीला भ्रम पडतो. यातून बाहेर पडण्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान आपल्या मनात बिंबवणं गरजेचं आहे. मग ईश्वर कुठे आहे. कलियुगात ईश्वर मंदिरात नाही, तो संतामध्ये आहे. त्याला ओळखण्याची पात्रता माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे. कलियुगात देवाने संतामध्येच देवत्व निर्माण केले आहे. स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतू नका. वैऱ्याशीही चांगले वागा. चांगले कर्म व आचरण केल्याने जीवनमान उंचावता येते. भक्तीमुळे पुण्य वाढते. पुण्य वाढले की मागच्या काळातील दुष्कर्म संपुष्टात येतात. मनाचे सामर्थ्य वाढले की उद्भवलेल्या प्रसंगात काय निर्णय घ्यायचा, कर्म कसे करायचे हे आपोआप सुचते. यासाठी दररोज भक्ती केली पाहिजे. सद्गुरु म्हणजे भक्तीची बँक आहे. सद्गुरुवर विश्वास ठेवा, तो तुमच्या पाठीशी उभा राहील. जोवर तुमच्यात अहंकार आहे तोवर देवाचा अनुभव येणार नाही. माणसाच्या मनात प्रचंड ऊर्जा, ताकद आहे. मन रिकामं राहीलं तर सैरावैरा पळतं. यासाठी मनाला काबूत ठेवणं गरजेचं आहे. मनावर संयम नसला तर वाईट घडतं. मन विक्षिप्त झालं, संस्काराला सोडून वागायला लागलं तर जीवनात दु:ख, त्रास होतो. जीवनाची दुर्दशा होते. अपयश व नैराश्य येते. माणसाचं मन माणसाला राजा व भिकारीही बनवू शकतं. यशामुळे माणसाचा अहंकार वाढतो व अहंकारातून माणूस संपतो. त्यासाठी अहंकार बाळगू नका, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी माजी आ. रामरतन राऊत, नगराध्यक्षा पौर्णिमा शहारे, जि.प.च्या बांधकाम व अर्थ समिती सभापती रचना गहाणे, शिव शर्मा, उमाकांत ढेंगे, विजय कापगते, संज़य ठाकरे, दीपक गुप्ता, हर्षल मोदी, प्रकाश गहाणे, अशोक चांडक, गिरीष पालीवाल उपस्थित होते. संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत २५ निराधार महिलांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे १० हजार दर्शनार्र्थींनी हजेरी लावली. (तालुका प्रतिनिधी)