शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भक्तीमुळे वाढतो पुण्यसंचय

By admin | Updated: February 7, 2017 01:00 IST

भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात.

कानिफनाथ महाराज : प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रमअर्जुनी मोरगाव : भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात. हरिनामामध्ये प्राबल्य आहे. प्राबल्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकतो. यासाठी भक्ती करा व जीवन सुखमय बनवा, असे प्रतिपादन जगतगुरु नरेंद्र महाराज यांचे वारसदार कानिफनाथ महाराज यांनी केले.ते येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, जो रंजल्यागांजल्यांची सेवा करतो, जिथे तुझा आणि माझा असा भेदभाव नसतो तिथेच ईश्वर आपले अस्तित्व निर्माण करतो. प्रत्येकाच्या जीवनात दु:ख येतात. मात्र या दु:खाला माणूसच कारणीभूत असतो. माणसाचे विचार, आचरण पवित्र असले पाहिजे. ईश्वर सांगतो आतातरी जागे व्हा. मुनष्य झोपी गेलेला असतो तेव्हा कान व डोळे उघडे असतात. परंतु अंतर्मनातला माणूस झोपलेला असतो. माणसाचं काम प्रेम देणं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं आहे. माणूस निस्वार्थ भावनेने जगला पाहिजे, पण असे घडत नाही. याचाच अर्थ आपण अद्याप मनातून जागे झालेलो नाही. ज्याने जीवनाच्या केंद्रबिंदूला घट्ट मिठी मारली तो आमिष, वासना व स्वार्थाला बळी पडत नाही. आपण ज्याला माझं म्हणतो ते आपलं नाही. तरी सुद्धा माणूस आमिषाला बळी पडतो व नुकसान होते. माणसाने ज्या गोष्टीला माझं म्हटलं आहे तिथेच प्रश्न निर्माण होतात व दु:ख वाट्याला येते. माया जीवनात आनंद देते. पण तेवढेच दु:खही देते. ज्यावेळी माणसात भ्रम, अहंकार निर्माण होतो, तेव्हा मनुष्य बुडतो. मायेची माणसाला नशा येते. बुद्धीला भ्रम पडतो. यातून बाहेर पडण्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान आपल्या मनात बिंबवणं गरजेचं आहे. मग ईश्वर कुठे आहे. कलियुगात ईश्वर मंदिरात नाही, तो संतामध्ये आहे. त्याला ओळखण्याची पात्रता माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे. कलियुगात देवाने संतामध्येच देवत्व निर्माण केले आहे. स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतू नका. वैऱ्याशीही चांगले वागा. चांगले कर्म व आचरण केल्याने जीवनमान उंचावता येते. भक्तीमुळे पुण्य वाढते. पुण्य वाढले की मागच्या काळातील दुष्कर्म संपुष्टात येतात. मनाचे सामर्थ्य वाढले की उद्भवलेल्या प्रसंगात काय निर्णय घ्यायचा, कर्म कसे करायचे हे आपोआप सुचते. यासाठी दररोज भक्ती केली पाहिजे. सद्गुरु म्हणजे भक्तीची बँक आहे. सद्गुरुवर विश्वास ठेवा, तो तुमच्या पाठीशी उभा राहील. जोवर तुमच्यात अहंकार आहे तोवर देवाचा अनुभव येणार नाही. माणसाच्या मनात प्रचंड ऊर्जा, ताकद आहे. मन रिकामं राहीलं तर सैरावैरा पळतं. यासाठी मनाला काबूत ठेवणं गरजेचं आहे. मनावर संयम नसला तर वाईट घडतं. मन विक्षिप्त झालं, संस्काराला सोडून वागायला लागलं तर जीवनात दु:ख, त्रास होतो. जीवनाची दुर्दशा होते. अपयश व नैराश्य येते. माणसाचं मन माणसाला राजा व भिकारीही बनवू शकतं. यशामुळे माणसाचा अहंकार वाढतो व अहंकारातून माणूस संपतो. त्यासाठी अहंकार बाळगू नका, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी माजी आ. रामरतन राऊत, नगराध्यक्षा पौर्णिमा शहारे, जि.प.च्या बांधकाम व अर्थ समिती सभापती रचना गहाणे, शिव शर्मा, उमाकांत ढेंगे, विजय कापगते, संज़य ठाकरे, दीपक गुप्ता, हर्षल मोदी, प्रकाश गहाणे, अशोक चांडक, गिरीष पालीवाल उपस्थित होते. संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत २५ निराधार महिलांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे १० हजार दर्शनार्र्थींनी हजेरी लावली. (तालुका प्रतिनिधी)