शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळातच क्षेत्राचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:59 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात जेव्हा जेव्हा भाजपाचा खासदार निवडून आला. तेव्हा तेव्हा या भागाचा विकास होण्याऐवजी अधोगती झाली आहे. मागील चार वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नसून एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागला नाही. गोंदिया-भंडारा जिल्हाचा सर्वांगिण विकास केवळ खा.प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात झाला.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : राष्ट्रवादी काँग्रेस बुथ कमिटी सभेत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात जेव्हा जेव्हा भाजपाचा खासदार निवडून आला. तेव्हा तेव्हा या भागाचा विकास होण्याऐवजी अधोगती झाली आहे. मागील चार वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नसून एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागला नाही. गोंदिया-भंडारा जिल्हाचा सर्वांगिण विकास केवळ खा.प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात झाला. त्यांच्याच कार्यकाळात अदानी विद्युत प्रकल्प, बिरसी विमानतळाचे आधुनिकीकरण, भेल प्रकल्प व अनेक नवीन रेल्वे गाड्यांना गोंदिया येथे थांबा मिळाला. या क्षेत्राच्या विकास करण्याची आणि मोठे प्रकल्प खेचून आणण्याची क्षमता केवळ प्रफुल्ल पटेल यांच्यात असल्याचे मत माजी आ.राजेंद्र जैन यांनी व्यक्त केले.राष्टÑवादी काँग्रेस बुथ कमिटीची बैठक रविवारी (दि.२७) शहरातील रामनगर येथे पार पडली. या वेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी विजय शाहू, अब्दुल गफार, नजीर तिगाला, विष्णू शर्मा, इदरीसभाई, सलीमभाई, आर.व्ही.पोचलवार, शमीम कुरैशी, वामन गेडाम, मिर्झा नबीबेग, कदीर खान, आरीफ शेख, मकसुद अली, इस्माईल शेख, शेख इस्तेपाक, अमित बोरकर, पिंटू डोंगरे, आबीद मुकीफ, टिकू चव्हाण, वासुदेव ढेंगे, शेख मोहम्मद, महेंद्र नायडू, इरफान शेख, सुनील उमरे, एस.एच.पोरचेट्टीवार, नईम कुरैशी, किरीट जेटवा उपस्थित होते. जैन म्हणाले, केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने दिली होती. दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. उलट मागील चार वर्षांत बेरोजगारीत वाढ झाली असून शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यात पंधरा हजार शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा सर्वांगिन विकास केवळ प्रफुल्ल पटेल यांच्याच नेतृत्त्वात शक्य असून यासाठी दोन्ही जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. अशोक सहारे यांनी बुथ कमिटी सदस्यांनी प्रत्येक बुथ बळकट करुन पटेल यांचा विजयाचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले. विनोद हरिणखेडे म्हणाले बुथ कमिट्या या कार्यकर्त्यांच्या एकतेचे प्रतीक असून यांची निवडणुकीच्या कालावधीत महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. शिव शर्मा यांनी विद्यमान सरकारच्या ध्येय धोरणावर जोरदार टिका केली. यावेळी खालीद पठाण, विजय जयस्वाल, रफीकभाई यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. संचालन दीपक कनोजे यांनी केले तर आभार प्रवीण रुपारेल यांनी मानले.