शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

५० स्थळांचा विकास करणार

By admin | Updated: May 5, 2016 01:59 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गेले ते पुनित झाले आहे. त्यांनी भेटी दिलेल्या राज्यातील ५० स्थळांची निवड करण्यात आली असून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल,

पालकमंत्री : भीमघाट येथे बौध्द सामूहिक विवाहगोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गेले ते पुनित झाले आहे. त्यांनी भेटी दिलेल्या राज्यातील ५० स्थळांची निवड करण्यात आली असून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. १ मे रोजी छोटा गोंदिया येथील पांगोली नदीकाठावरील भिमघाट येथील बुध्द विहार परिसरात आयोजित बौध्द सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी ए.बी. बोरकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भंते जीवन कीर्ती, भरत क्षत्रीय, धनंजय वैद्य, अशिम शेख, रतन वासनिक, वसंत गणवीर, श्याम चवरे, बंडू ठवरे, पौर्णिमा वालदे, कुंदा भास्कर, मंजुश्री बोरकर, गडपायले उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, मागील २८ वर्षांपासून भीमघाट स्मारक समिती ही बौध्द सामूहिक विवाहाचे आयोजन करीत आहे. अनेक समाजात आजकाल सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. बौध्द समाजात सामूहिक विवाह सोहळे कमी होतात, ही संख्या वाढली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामूहिक विवाह सोहळ्याची दिशा दिली. डॉ.बाबासाहेबांच्या विचारातून प्रेरीत होऊन ही समिती काम करीत आहे. बाबासाहेबांच्या अस्थीचे जतन भिमघाट समितीने केल्यामुळे हा परिसर पावन झाले. भिमघाटाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. भिमघाट समितीने विकासाचे नियोजन करावे, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्या नवदांम्पत्यांना त्यांच्या सार्थक जीवनासाठी आशिर्वाद दिला. बोरकर म्हणाले, डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मागील २८ वर्षापासून आपण सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहोत. घरोघरी जाऊन विनंती करु न आपल्या पाल्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यातच करण्याचा आग्रह करीत असतो. नवदाम्पत्यांना भावी जीवनात रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मदत करण्यात येते. तर असलेला रोजगार आणखी भरभराटीस गेला पाहिजे यासाठी त्यांना मदत करीत असल्याचे सांगितले. विनोद अग्रवाल म्हणाले, सामूहिक विवाह सोहळे ही आज काळाची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीने भीमघाट समिती काम करीत आहे. भीमघाटच्या विकासासाठी आपणसुद्धा सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी १२ जोडपी या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली. कार्यक्रमाला बौध्द बांधवांची हजारोच्या संख्येत उपस्थिती होती. संचालन लक्ष्मीकांत डहाट यांनी केले. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी कमलेश वैद्य, किसन भगत, राजू दोनोडे यांच्यासह स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)