शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

अटकेतील आरोपीच कोठडीतील मृत्यूचे ‘आय विटनेस’ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

नरेश रहिले /(रिपोर्ट ऑन दी स्पॉट) गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतलेल्या चोरीच्या प्रकरणातील ...

नरेश रहिले /(रिपोर्ट ऑन दी स्पॉट)

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतलेल्या चोरीच्या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एका आरोपीचा संशयास्पदरीत्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यूसंदर्भात मृताचे नातेवाईक पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करीत आहेत. तर पोलीस हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आहे हे सांगत आहेत. परंतु आमगावच्या पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या राजकुमार अभयकुमार धोतीचा (३०) मृत्यू कशाने झाला याची साक्ष देणारे ‘आय विटनेस’ त्याच्या सोबत अटक झालेले दोन तरुण आहेत.

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु कोठडीत असताना राजकुमार धोती (३०) याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. राजकुमार याला अटक केले तेव्हा त्याच्यासोबत सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोघेही अटकेत असल्याने ते तिघेही सोबतच होते. राजकुमार याच्यासोबत काय काय झाले. मारहाण झाली किंवा नाही याची माहिती देणारे हे दोघेही ‘आय विटनेस’ आहेत. त्यांना न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ते पोलीस कोठडीत सोबत असतानाच हा प्रकार घडल्याने राजकुमार धोतीचा मृत्यू नेमका कशाने झाला याची हे दोघेच साक्ष देतील.

बॉक्स

शरीरावरचे व्रण काय सांगून जातात?

राजकुमार धोती याच्या शरीरावर व्रण असल्याचा फोटो नातेवाईक व समाजमाध्यमांनी काढला. त्याच्या शरीरावर व्रण व जखमा असल्याने त्याला मारहाण तर झाली नाही. मारहाण झाली तर त्याचे साक्षीदार अटक असलेले सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोन आरोपी आहेत. परंतु ते सध्या कोठडीत असतांना त्यांच्यावर पोलिसांचा दबाव असू नये म्हणून आता त्यांचे बयान घेऊ नये. ते सुटून घरी परतल्यावर त्यांचे बयान नोंदवायला पाहिजे, असाच सूर घटनास्थळावर उमटत होता.

बॉक्स

न्यायालयीन चौकशीची होतेय मागणी

पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास त्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येतो. परंतु या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन प्रक्रियेतून व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. न्यायालयीन चौकशीतून सत्यता पुढे येईल. पोलीस कोठडीत झालेला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू नेमका कशाने हे विसेरा अहवाल सांगेल. परंतु या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाल्यास ‘दूध का दूध और पानी का पानी होईल’ असेच म्हटले जात आहे.