शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

१० एकरातील धानपीक नष्ट

By admin | Updated: May 12, 2015 01:30 IST

विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे गोंदिया तालुक्याच्या दत्तोरा येथील शेतकऱ्यांचे १० एकरातील धानपीक

विद्युत पुरवठा खंडित : १५ दिवसांपासून शेतकरी त्रस्तगोंदिया : विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे गोंदिया तालुक्याच्या दत्तोरा येथील शेतकऱ्यांचे १० एकरातील धानपीक नष्ट झाले. १२ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे शेतीला पाणी मिळाले नाही. त्यामुळे धानपीक वाळले आहे.रावणवाडी विद्युत कार्यालयांतर्गत येणाऱ्या दत्तोरा येथील शेताला पाणी देण्यासाठी शेतपरिसरात असलेल्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड आला.परिणामी शेतपिकाला पाणी देता आले नाही. तीव्र उन्हामुळे शेतकऱ्यांचे धानपीक पाण्याअभावी वारले आहे. शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा नसल्याने मागील दहा ते बारा दिवसांपासून शेतकऱ्यांनी लाईनमन गायधने व सहाय्यक अभियंता अनंत प्रसादकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. परंतु लाईनमन फोन बंद ठेवतात तर अभियंता फोन उचलून आज करू उद्या करू असे बोलून टाळतात. हा प्रकार मागील १० ते १२ दिवसांपासून सुरू आहे. शेतीला पाणी न मिळाल्यामुळे दत्तोरा येथील लक्षमी महारवाडे, उमेश महारवाडे, सतीश मेश्राम, मधुकर डोंगरे, बबलू शेंडे यांच्या शेतातील १० एकरातील धानपीक पाण्याअभावी नष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी १० दिवसांच्या काळात ५० वेळा अभियंत्याला संपर्क साधला. यात काही वेळा फोन लागला तर काही वेळा त्यांनीही आपला फोन बंद करून ठेवला होता. विद्युत अभावी शेतीला पाणी मिळू शकले नाही व पाण्याअभावी धानपीक नष्ट झाले आहे. ऐन गर्भात असणाऱ्या धानाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)२५ जणांना कनेक्शन दिले नाहीदत्तोरा येथील २५ शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षापासून विद्युत कनेक्शन करीता अर्ज केले. परंतु त्यांना कनेक्शन देण्यात आले नाही. मागील चार महिन्यापूर्वी विद्युत वितरण कंपनीने या गावातील शेतातवर विद्युत खांब गाडले. दोन महिन्यापूर्वी वाहिन्या टाकल्या. परंतु शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले नाही.