शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

हंगामाला सुरुवात होऊनही ४२ टक्केच पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेतीची कामे करताना आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी नाबार्ड आणि शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. यंदा नाबार्डने खरीप हंगामासाठी बँकांना २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी सर्व बँकांनी आतापर्यंत एकूण ११४ कोटी ८३ लाख रुपयांचे वाटप केले आहे.

ठळक मुद्देशासन निर्देशाच्या अंमलबजावणीचा अभाव : राष्ट्रीयकृत बँकांची कासवगती कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आठवडाभरापूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व राष्ट्रीयकृत, जिल्हा आणि ग्रामीण बँकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याचे आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळटाळ करु नये,अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही राष्ट्रीयकृत, ग्रामीण बँकाकडून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी आहे. तर खरीप हंगामाला सुरूवात होवून जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ ४२ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेतीची कामे करताना आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी नाबार्ड आणि शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. यंदा नाबार्डने खरीप हंगामासाठी बँकांना २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी सर्व बँकांनी आतापर्यंत एकूण ११४ कोटी ८३ लाख रुपयांचे वाटप केले आहे. याची टक्केवारी ४२.५३ टक्के आहे.राष्ट्रीयकृत बँका अद्यापही पीक कर्ज वाटपात माघारल्या असून या बँकांनी केवळ १४ कोटी २३ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.तर ग्रामीण बँकांनी १३ कोटी ५८ लाख आणि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ८७ कोटी ६४ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर असून या बँकेतून पीक कर्जाची उचल करणाºया शेतकºयांची संख्या सुध्दा अधिक आहे. इतर बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया किचकट नसल्याने शेतकरी सुध्दा या बँकेतून पीक कर्जाची उचल करण्यास प्राधान्य देतात.विशेष म्हणजे जिल्हा बँकेने सुरूवातीलाच शासन निर्देशानुसार महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या यादीतील शेतकºयांना पीक कर्ज देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे याची सुध्दा शेतकºयांना बरीच मदत होत आहे. मात्र राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे काही दिवसांपूर्वी असा प्रकार सुध्दा उघडकीस आला होता.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज