शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

वैनगंगा नदीचे झाले वाळवंट !

By admin | Updated: April 17, 2016 01:32 IST

चांदोरी खुर्द, पिपरिया, सावरा, अर्जुनी, परसवाडा, बोरा, बाघोली, बिहीरीया या गावात दोन वर्षापासून उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

रबी पिकांना फटका : चांदोरी खुर्द परिसरात १०० हेक्टर धान धोक्यातपरसवाडा : चांदोरी खुर्द, पिपरिया, सावरा, अर्जुनी, परसवाडा, बोरा, बाघोली, बिहीरीया या गावात दोन वर्षापासून उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र यावर्षी वैनगंगेच्या पात्रात पुरेसे पाणी नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीत सावरापर्यंत स्थिर असते. त्यामुळे या गावात वैनगंगेच्या पाण्यामुळे विद्युत पंपाद्वारे पाण्याचा उपसा करून उन्हाळी धानाची लागवड केली जाते. पण यावर्षी मार्च अखेरपासूनच वैनगंगेत पाणी कमी होऊ लागले. संपूर्ण तीन किमीचा चांदोरी खुर्द ते सावरापर्यंत पाणी खाली गेल्याने नदीपात्राचे वाळवंट झाले आहे. पाणी १५ ते २० फुट खोल होते. त्या ठिकाणी पांढरी रेतीच दिसते. विद्युत पंप कोरडे पडले आहे. धान पीक वाळू लागले आहे. पीक वाळू नये म्हणून शेतकऱ्यांनी मध्यठिकाणी पाणी साठविले आहे. त्या ठिकाणाहून जेसीपी कालवा काढून विद्युत पंपाजवळ काठावर खड्डा खोदून पाणी आणने सुरू आहे. प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपयोगात येत नाही. त्यामुळे या आठ गावातील रब्बी पिक धोक्यात आले आहे. कर्ज काढून धान लावले तेही गेले तर आत्महत्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी बोलतात. पाणी वैनगंगेत अडल्याने काही प्रमाणात विहीरी-बोर भरल्या होत्या. पाणी खाली गेल्याने संपूर्ण विहीरी-बोर आटल्या. एप्रिल महिन्यात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. आणखी धान पिक निघण्यासाठी एक महिनाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)