शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मानव विकासच्या बसेसपासून वंचित

By admin | Updated: January 13, 2015 23:02 IST

कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या

केशोरी : कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या विद्यार्थीनीसाठी बसेसची सेवा उपलब्ध केली. परंतु केशोरी परिसरातील दिनकरनगर, प्रतापगड, गोठणगाव, चिचोली, वडेगाव (बंध्या), परसटोला, बोंडगाव (सुरबन), पुष्पनगर अ, पुष्पनगर ब या गावासाठी साकोली आगार प्रमुखानी बसफेरी सुरू न केल्यामुळे येथील २४५ शालेय विद्यार्थीनींना अजूनही पायी चालत शाळेत यावे लागते. अहिल्याबाई होळकर बस पास सवलत आणि इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनीसाठी मानव विकासअंतर्गत बस पास सवलतीअंतर्गत बसफेरी सुरू केली आहे. परंतु केशोरी येथील विविध शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीसाठी मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याच्या संदर्भात सबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रयत्न केले. साकोली आगार प्रमुख केशोरी परिसरातील विद्यार्थीनीसाठी बसफेरी सुरू करण्यास असमर्थ ठरले. या मागणीसंबधी मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकाऱ्यंना विनंती करून मानव विकास बसफेरी सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी गोंदिया यांनी त्याचे पत्र क्र. जिकाना/संकीर्ण/६१०/२०१४ दि. ४.०९.२०१४ अन्वये साकोली आगर प्रमुखांच्या नावे पत्र देऊन मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याचे आदेश देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागीतला.परंतु चक्क साकोली आगार प्रमुखांनी सदर पत्रावर कोणतीही कार्यवाही न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या पात्राला केराची टोपली दाखविली आहे. वास्तविक मानव विकासअंतर्गत सुरू असलेल्या बसफेऱ्यांचे नियोजन करण्याचे अधिकार सबंधित आगार प्रमुखांना देण्यात आली आहेत.परंतु म.रा. परिवहन मंडळातील अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी केशोरी परिसरातील २४५ शालेय विद्यार्थीनी अजून शाळा-महाविद्यालयात पायदळ येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)