शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

मानव विकासच्या बसेसपासून वंचित

By admin | Updated: January 13, 2015 23:02 IST

कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या

केशोरी : कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या विद्यार्थीनीसाठी बसेसची सेवा उपलब्ध केली. परंतु केशोरी परिसरातील दिनकरनगर, प्रतापगड, गोठणगाव, चिचोली, वडेगाव (बंध्या), परसटोला, बोंडगाव (सुरबन), पुष्पनगर अ, पुष्पनगर ब या गावासाठी साकोली आगार प्रमुखानी बसफेरी सुरू न केल्यामुळे येथील २४५ शालेय विद्यार्थीनींना अजूनही पायी चालत शाळेत यावे लागते. अहिल्याबाई होळकर बस पास सवलत आणि इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनीसाठी मानव विकासअंतर्गत बस पास सवलतीअंतर्गत बसफेरी सुरू केली आहे. परंतु केशोरी येथील विविध शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीसाठी मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याच्या संदर्भात सबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रयत्न केले. साकोली आगार प्रमुख केशोरी परिसरातील विद्यार्थीनीसाठी बसफेरी सुरू करण्यास असमर्थ ठरले. या मागणीसंबधी मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकाऱ्यंना विनंती करून मानव विकास बसफेरी सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी गोंदिया यांनी त्याचे पत्र क्र. जिकाना/संकीर्ण/६१०/२०१४ दि. ४.०९.२०१४ अन्वये साकोली आगर प्रमुखांच्या नावे पत्र देऊन मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याचे आदेश देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागीतला.परंतु चक्क साकोली आगार प्रमुखांनी सदर पत्रावर कोणतीही कार्यवाही न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या पात्राला केराची टोपली दाखविली आहे. वास्तविक मानव विकासअंतर्गत सुरू असलेल्या बसफेऱ्यांचे नियोजन करण्याचे अधिकार सबंधित आगार प्रमुखांना देण्यात आली आहेत.परंतु म.रा. परिवहन मंडळातील अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी केशोरी परिसरातील २४५ शालेय विद्यार्थीनी अजून शाळा-महाविद्यालयात पायदळ येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)