शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

मानव विकासच्या बसेसपासून वंचित

By admin | Updated: January 13, 2015 23:02 IST

कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या

केशोरी : कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या विद्यार्थीनीसाठी बसेसची सेवा उपलब्ध केली. परंतु केशोरी परिसरातील दिनकरनगर, प्रतापगड, गोठणगाव, चिचोली, वडेगाव (बंध्या), परसटोला, बोंडगाव (सुरबन), पुष्पनगर अ, पुष्पनगर ब या गावासाठी साकोली आगार प्रमुखानी बसफेरी सुरू न केल्यामुळे येथील २४५ शालेय विद्यार्थीनींना अजूनही पायी चालत शाळेत यावे लागते. अहिल्याबाई होळकर बस पास सवलत आणि इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनीसाठी मानव विकासअंतर्गत बस पास सवलतीअंतर्गत बसफेरी सुरू केली आहे. परंतु केशोरी येथील विविध शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीसाठी मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याच्या संदर्भात सबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रयत्न केले. साकोली आगार प्रमुख केशोरी परिसरातील विद्यार्थीनीसाठी बसफेरी सुरू करण्यास असमर्थ ठरले. या मागणीसंबधी मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकाऱ्यंना विनंती करून मानव विकास बसफेरी सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी गोंदिया यांनी त्याचे पत्र क्र. जिकाना/संकीर्ण/६१०/२०१४ दि. ४.०९.२०१४ अन्वये साकोली आगर प्रमुखांच्या नावे पत्र देऊन मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याचे आदेश देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागीतला.परंतु चक्क साकोली आगार प्रमुखांनी सदर पत्रावर कोणतीही कार्यवाही न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या पात्राला केराची टोपली दाखविली आहे. वास्तविक मानव विकासअंतर्गत सुरू असलेल्या बसफेऱ्यांचे नियोजन करण्याचे अधिकार सबंधित आगार प्रमुखांना देण्यात आली आहेत.परंतु म.रा. परिवहन मंडळातील अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी केशोरी परिसरातील २४५ शालेय विद्यार्थीनी अजून शाळा-महाविद्यालयात पायदळ येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)