शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

भटके विमुक्त सोयी सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:02 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात भटक्या विमुक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या समाजाच्या लोकांना सोयी ....

ठळक मुद्देहेरंब कुलकर्णी : शासनाला सादर करणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात भटक्या विमुक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या समाजाच्या लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी निधीची तरतूद केली जाते. पण सामाजिक न्यायमंत्र्यांच्या जिल्ह्यात भटके विमुक्त सोयी सुविधांपासून वंचित आहेत. ही बाब दुर्देवी असल्याचे जेष्ठ समाजसेवक व साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी येथे सांगितले.राज्यातील विविध जिल्ह्यात भटक्या विमुक्तांची स्थिती काय आहे, जागतिकीकरणानंतर द्रारिद्र्य कमी झाले का? याचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शंभर गावांच्या अभ्यास दौºयावर ते आहेत. गुरूवारी (दि.३) ते येथे आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. भटक्या विमुक्तांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०११ पासून सुरू केली. पण, गेल्या सहा वर्षांत यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील एकूण ८० लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. विशेष म्हणजे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याच जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगितले.गोंदिया येथील अदासी, कुडवा, अण्णाभाऊ साठेनगर येथे भेट देऊन भटक्या विमुक्तांच्या समस्या जाणून घेतल्या. या लोकांकडे अद्यापही शिधापत्रिका नाही, विविध प्रमाणपत्रांपासून ते अद्यापही वंचित आहे. शासनातर्फे राबविल्या जाणाºया योजनांची त्यांना माहितीच नाही. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही त्यांना उपेक्षेचे जीवन जगावे लागत आहे. गावातील लोकांकडून अन्याय अत्याचार सहन करावा लागत असल्याचे कुलकर्णी म्हणाले. या समाजातील मुले शिक्षणापासून कोसो दूर आहेत. अजूनही शासनाच्या योजना आणि अधिकारी त्यांच्या वस्त्यांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळेच त्यांचा दररोज द्रारिद्र्याशी संघर्ष सुरू आहे. सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी किमान एकदा या भटके विमुक्तांच्या वस्तीला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यावात. या वस्त्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर योजना राबविण्याची मागणीही कुलकर्णी यांनी केली.शंभर गावांचा करणार अभ्यासमानवी निर्देशांक कमी असलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील पाच गावांना भेटी देऊन तेथील स्थितीची माहिती कुलकर्णी घेणार आहेत. शाळाबाह्य मुलांची संख्या, भटके विमुक्तांचे प्रश्न या सर्व गोष्टींचा अभ्यास व अहवाल तयार करुन तो हिवाळी अधिवेशादरम्यान शासनाला सोपविणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.