शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पतंगी तलावाचे खोलीकरण

By admin | Updated: May 26, 2017 00:40 IST

पतंगी तलावात गाळ साचल्याने पाण्याचा साठा कमी असतो तो गाळ काढून झाल्यावर पाण्याचा साठा वाढेल,

पाणीसाठा वाढेल : लोकसहभागातून गाळ काढण्याला सुरुवात लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : पतंगी तलावात गाळ साचल्याने पाण्याचा साठा कमी असतो तो गाळ काढून झाल्यावर पाण्याचा साठा वाढेल, जणावरांना पिण्याची सोय होईल. परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढेल तसेच हा गाळ शेतात टाकल्याने शेतीची सुपिकता वाढून पिके भरघोष घेता येतील, असे मत वडेगावच्य सरपंच तुमेश्वरी बघेले यांनी लोकसहभागातून तलावाचे खोलीकरण कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले.या वेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिता मडावी, पं.स. सदस्या निता रहांगडाले, नायब तहसीलदार आर.डी. पटले, ग्राम विकास अधिकारी व्ही.बी. सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य लिलाधर बिसेन, सुनील टेंभरे, चंदा शर्मा, ममता ठाकरे, पोलीस पाटील मुन्ना सोनवाने, विजय असाटी, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक बडगे, मारूती चावके, लोकेश मिश्रा, तलाठी नरेश उगवकर प्रामुख्याने उपस्थित होते. गाळ काढण्याच्या कामात जेसीबीने खोलीकरण व ट्रॅक्टरने शेतात नेवून टाकणे, १०० रुपये प्रत्येक ट्रॅक्टर व जेसीपी असे २०० रुपये फक्त प्रत्येक ट्रिपमागे लागणार आहेत. त्यामुळे माती टाकणाऱ्या शेतकऱ्यांची रिघ लागली आहे. हे सर्व काम शासनाकडून एकही रुपया न घेता लोकसहभागातून होत आहे. संचालन लोकेश मिश्रा यांनी केले. आभार सचिव व्ही.बी. सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपसरपंच सुधीर मेश्राम, ग्रा.पं. सदस्य राजेश कावळे, प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांनी सहकार्य केले.