शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेत प्रशासनाची उदासीन भूमिका

By admin | Updated: February 26, 2015 00:59 IST

राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून पाण्याचे स्त्रोत विकसित करण्याचा निर्णय घेतला.

गोंदिया : राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून पाण्याचे स्त्रोत विकसित करण्याचा निर्णय घेतला. पण या अभियानाच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा प्रशासनाची भूमिका उदासीन असल्यामुळे कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही हे अभियान राबविण्याच्या बाबतीत औदासिन्य येत आहे.जलयुक्त अभियानात प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या अभियानातून कोणत्या गावात काय करता येईल, याची माहिती सर्व विभागांकडून मागविण्यात आली. जिल्हाधिकारी अध्यक्ष आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य सचिव असलेल्या जिल्हास्तरीय समितीने त्या माहितीच्या आधारावर कोणत्या तालुक्यात कोणती कामे करायची याचे नियोजन केले. त्यानुसार निधीही दिला जात आहे. दि.१९ ला तिरोडा तालुक्यातील घोगरा ग्रामपंचायतअंतर्गत पाटीलटोला येथील मामा तलावावर या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्यासह या अभियान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, गटविकास अधिकारी जमईवार, तहसीलदार, कृषी अधिकारी आदी सर्व छोटेमोठे अधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनीच दांडी मारली. या कार्यक्रमाला हजर राहण्याऐवजी ते कुटुंबियांसोबत नागपूर येथे फिरायला गेले असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक त्या दिवशी शासकीय सुटी असली तरी इतर सर्व अधिकारी या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ असल्यामुळे तिरोडा येथील कार्यक्रमाला आवर्जुन हजर होते. त्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही यावेळी हिरमोड झाला. एवढेच नाही तर आमदार रहांगडाले यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने वेळीच कारभार सुधारण्याची मागणी आहें. (जिल्हा प्रतिनिधी)