शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कृषी विभाग म्हणतो, चार दिवसात येणार युरिया; विक्रेते म्हणतात साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:15 IST

गोंदिया जिल्ह्यात युरियाची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी युरिया खत मिळत नसल्याचे त्यांची कोंडी झाली असून युरियाचा पुरवठा करा हो अशी ओरड शेतकऱ्यांची होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देयुरियामुळे शेतकऱ्यांची कोंडी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वीच १३०० मेट्रीक टन युरियाची रॅक आली होती.यानंतर या युरियाचा जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना पुरवठा सुध्दा करण्यात आला. मात्र हा साठा दोन दिवसातच संपल्याने जिल्ह्यात युरियाची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी युरिया खत मिळत नसल्याचे त्यांची कोंडी झाली असून युरियाचा पुरवठा करा हो अशी ओरड शेतकऱ्यांची होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. धानाच्या रोवणीसाठी शेतकऱ्यांना सर्वाधिक युरिया खताची गरज असते. त्यामुळे दरवर्षी याच कालावधीत युरियाची मागणी वाढत असते. त्याच दृष्टीने कृषी विभागाने यंदा १४ हजार ४०५ युरियाची मागणी केली होती. यापैकी आतापर्यंत ११ हजार १४३ मेट्रीक टन युरियाचा पुरवठा झाला आहे. मागणीच्या तुलनेत जवळपास ३ हजार ५०० मेट्रीक टन युरियाचा कमी पुरवठा झाल्याने सध्या बाजारपेठेत युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात युरिया खत मिळत नसल्याची ओरड वाढल्यानंतर खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली येथील खत कंपन्याच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करुन खताचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर १५ जुलैला १३०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली होती. त्यानंतर या खताचा संपूर्ण जिल्ह्यातील विक्रेत्यांना पुरवठा करण्यात आल्याचा दावा वितरक करीत आहे. मात्र जेवढा युरिया आला त्यापैकी बराच युरिया अद्यापही काही वितरकांनी गोदामात साठवून ठेवल्याची ओरड चिल्लर विक्रेत्यांमध्ये आहे.

शिवाय दोन दिवसांपूर्वीच गोंदिया-गोरेगाव मार्गावरील तुमखेडा येथील गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा आढळला होता. जर जिल्ह्यातील छोट्या विक्रेत्यांना युरियाचा पुरवठा करण्यात आला तर गोदामात ऐवढ्या मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील मोठे विक्रेते जरी युरियाचा सर्व चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा झाल्याचा दावा करित असले तरी युरियाच्या पुरवठ्या मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याची वरिष्ठांनी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

दीड लाख हेक्टरमधील रोवणी शिल्लकयंदा पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. आतापर्यंत केवळ ४५ हजार हेक्टरमधील रोवणी आटोपली आहे. १ लाख ४४ हजार हेक्टरमधील रोवणी शिल्लक आहे. त्यातच युरिया मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड वाढली आहे. केवळ २५ टक्के रोवणी झाली असताना ही स्थिती असल्याने ७५ टक्के रोवणी शिल्लक आहे. त्यामुळे युरियासाठी शेतकऱ्यांची अधिक कोंडी होण्याची शक्यता आहे.२६६ रुपयांचा युरिया ३५० रुपयांनाजिल्ह्यात युरियाच्या निर्माण झालेल्या टंचाईचा काही विक्रेते फायदा उठवित आहे. युरियाच्या प्रती चुंगडीची किमत २६६ रुपये ५० पैसे आहे.मात्र काही विक्रेते ३५० रुपये प्रती चुंगडी दराने युरियाची विक्री करित असल्याची शेतकऱ्यांची ओरड सुरू आहे. शेतकऱ्यांना प्रति बॅग १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती