शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

डेंग्यू, मलेरिया पाय पसरतोय

By admin | Updated: July 24, 2014 23:55 IST

पावसाळ्याचे दिवस आले की सगळीकडे घाण असते. या घाणीतून अनेक प्रकारचे डास, विषाणू, व किडे उत्पन्न होतात. पावसाळ्यात मानसापासून तर जनावरे व पशुपक्ष्यांना हे दिवस

काचेवानी : पावसाळ्याचे दिवस आले की सगळीकडे घाण असते. या घाणीतून अनेक प्रकारचे डास, विषाणू, व किडे उत्पन्न होतात. पावसाळ्यात मानसापासून तर जनावरे व पशुपक्ष्यांना हे दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्रासदायी व घाबरण्यासारखे असतात. या दिवसात सर्वांना काळजी घेणे महत्वाचे असते. जनतेमध्ये आरोग्याची भीती तर आरोग्य विभागाला जनतेत होणाऱ्या रोगराईची भीती असते. विविध प्रकारच्या गंभीर आजाराने जनता व आरोग्य विभाग दहशतीत असतो. अशावेळी जनता आणि आरोग्य विभागाने नेहमी संपर्कात राहण्याची गरज आहे.पावसाळ्यात तीन प्रकारच्या डासांपासून प्रत्येक नागरिकाने स्वत:चा बचाव करुन घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने नागरिकांना सावधान केले आहे. यावेळी डेंग्यू, हत्तीरोग आणि मलेरिया या रोगांची भीती सर्वांना असते. हे सर्व रोग डासांपासून उपजत असून त्वरीत उपचार करण्यात आले नाही तर माणूस दगावतो. याकरिता सर्व नागरिकांनी सावध रहावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.डेंग्यू, हत्तीरोग आणि मलेरिया हे तिन्ही रोग डासांपासून होत असून डास तीन प्रकारचे आहेत. डेंग्यूच्या डासाला इजिप्ती म्हणतात. हा डास साचून असलेल्या स्वच्छ पाण्यात राहतो. मात्र डॉक्टर या रोगाला नियंत्रीत करण्याकरिता उच्च स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत प्रयत्नशील आहेत. त्वरीत काळजी घेतल्यास डॉक्टरांना उपचार करणे सोईस्कर होते, असे डॉक्टरांचे मत आहे.इजिप्ती (डेंग्यू) नावाच्या डासाबद्दल बोदा क्षेत्राचे एम.पी.डब्ल्यू. डॉ. पी.एस. बरईकर यांनी सांगितले की, हा डास एका वेळी ३०० ते ४०० अंडी देतो. याची उत्पत्ती तीव्र गतीने होत असल्याने नागरिकांनी घराच्या आवारात असलेले स्वच्छ पाण्याचे साचलेले साहित्य राहणार नाही किंवा ते खाली करुन ठेवावे. मडके, टाकी, टायर आदीमध्ये साचून असलेल्या स्वच्छ पाण्यात डास असतात आणि त्या ठिकाणी अंडी घालतात. या डासांमुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे डोके लालसर होणे, तापात चढ-उतार होणे, मळमळ वाटणे, उलट्या होणे, डोकेदुखी होणे, असे डॉ. बरईकर यांनी लोकमतला सांगितले. असे लक्षण दिसून आल्यास निष्काळजीपणा न करता आरोग्य विभागात जावून डॉक्टरांचा सल्ला व उपचार घ्यावे, असा सल्ला दिला आहे.डासांमुळे होणाऱ्या दुसरे आजार म्हणजे हत्तीरोग. याच्या डासाला क्युवलेस म्हणतात. हा डास साचलेल्या घाणेरड्या पाण्यात, नाल्यात आणि गटारात असतो. हा डाससुद्धा ३०० ते ४०० अंडी देत असून अंडीपासून तर त्याची संपूर्ण वयोमर्यादा ४८ दिवसांचे असते. वास्तविक पाहता तिन्ही प्रकारच्या डासांचे जीवनमान एकसारखेच असते. प्रभावशील असण्याचा काळ २१ दिवसांचा असतो, असेही आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.डासांचा तिसरा प्रकार म्हणजे अ‍ॅनाफिलीस. यालास मलेरिया डास म्हणतात. ती चावते आणि त्यापासून मलेरिया रोग होतो. या डासांचा जीवनकाळ वरीलप्रमाणेच असतो. यापासून होणाऱ्या रोगाची लक्षणेसुद्धा मिळते-जुळते अर्थात एकसारखे असतात, असे मलेरियाचे डॉ. पी.सी. बरईकर यांनी सांगितले.पावसाळ्याचे दिवस आल्याने प्रत्येक ठिकाणी पाणी साचून राहणे, घाण असणे हे स्वाभाविक असले तरी प्रत्येक नागरिकाने अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. परिसरातील असलेली घाण धुवून काढणे, स्वच्छ करणे, घर, परिसर, वास्तव्याची जागा स्वच्छ करणे आवश्यक आहे. औषधाचा वापर करावे. प्रत्येक नागरिकाने किंवा कुटुंबाने घरचे व बाहेरचे सर्व पाणी बाहेर टाकून घर कोरडे ठेवावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)