शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नगरसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:15 IST

मागील वर्षी निवेदन देऊनही प्रभागातील समस्या मार्गी न लागल्याने शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक सुनील तिवारी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच मंगळवारी (दि.१०) धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून मागणी प्रलंबित : नगर परिषदेचा गलथान कारभार उघड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी निवेदन देऊनही प्रभागातील समस्या मार्गी न लागल्याने शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक सुनील तिवारी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच मंगळवारी (दि.१०) धरणे आंदोलन सुरू केले आहे. कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक असलेले तिवारी यांच्यासोबत पक्षातील अन्य नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले. दरम्यान नगरसेवकाला समस्या मार्गी लागत नसल्याचे धरणे आंदोलन करावे लागत असेल तर शहरातील नागरिकांचे काय? असा सवाल देखील यामुळे उपस्थित केला जात आहे.शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक असलेले तिवारी यांनी प्रभागातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेत तीन नवीन पाणी टाक्या, एक बोअरवेल व एक टाकी दुरूस्त करून देण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी १५ मार्च २०१७ रोजी म्हणजेच मागील वर्षी नगराध्यक्षांना निवेदन दिले होते. नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता करणार असे आश्वासनही दिले होते असे तिवारी यांनी सांगीतले. मात्र आता वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनही तिवारी यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही. यंदा शहरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना याची झळ बसू नये, यासाठी तिवारी यांनी कुणालाही विनवणी करण्यापेक्षा मंगळवारी (दि.१०) थेट मुख्याधिकारी पाटील व नगराध्यक्ष इंगळे यांच्या कक्षासमोर धरणे आंदोलन सुरू केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत कॉंग्रेस पक्षाचे गट नेता व सभापती शकील मंसुरी, कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक भागवत मेश्राम, देवा रूसे, आलोक मोहंती, संदीप रहांगडाले, हरीश तुळसकर, रोहन रंगारी, निकेतन अंबादे, हिमांशू सोनकुसरे, गौरव चन्नेकर, शुभम सहारे, निक्की येडे व कार्यकर्ते उपस्थित होते.पालिकेच्या अकार्यक्षम कारभाराची प्रचितीमागील वर्षी करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता होत नाही. विशेष म्हणजे, आता नगरसेवकांच्याच मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नगरसेवकांना धरणे द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकारातून पालिकेचा कारभार किती सुरळीत सुरू आहे अशी प्रतिक्रीया नगर परिषद वर्तुळात उमटू लागल्या आहे. नगरसेवकांनाच आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाची पाळी आली असताना सर्वसामान्यांच्या समस्यांचे काय असा सवालही उपस्थित केला जात आहे.नगराध्यक्षांकडून मनधरणीचा प्रयत्नतिवारी धरणे देऊन बसले असतानाच नगराध्यक्ष इंगळे कार्यालयात आले. हा प्रकार बघून त्यांनी तिवारी व उपस्थित अन्य सदस्य व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षात या चर्चा करू असे म्हणत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्षभरापासून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने चांगलेच रागावलेले तिवारी यांनी कक्षात जाण्याचे टाळले. जोपर्यंत मागण्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत धरणे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.