शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीची वाटचाल हुकूूमशाहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:44 IST

देशात असलेल्या लोकशाहीची वाटचाल सध्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. ते संविधान व लोकशाही संपविण्याचे काम केंद्रातील विद्यमान सरकार करीत आहे.

ठळक मुद्दे नाना पटोले : अर्जुनी मोरगाव येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : देशात असलेल्या लोकशाहीची वाटचाल सध्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. ते संविधान व लोकशाही संपविण्याचे काम केंद्रातील विद्यमान सरकार करीत आहे. आमची लढाई याविरुद्ध आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न हाणून पाडावे, माझा लढा हा शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वंचितांसाठी आहे. याची पहिली प्रेरणा मला सर्वप्रथम अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून अनुभवायला मिळाली. असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी येथे केले.मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन ते बोलत होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष टोलसिंहभाऊ पवार हे होते. यावेळी मंचावर माजी आ. रामरतन राऊत, नामदेव किरसान, अमर वऱ्हाडे, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, भागवत नाकाडे, डॉ. बी.जी. भुतडा, अर्जुन नागपुरे, जगदीश मोहबंशी, राजेश नंदागवळी, होमराज कापगते, पं.स.च्या उपसभापती करुणा नांदगावे, विशाखा साखरे, आशा झिलपे, विलास गायकवाड, वंदना जांभुळकर, वंदना शहारे, जगदीश येरोला, मलेशाम येरोला, दीपक पवार, दिलीप डोये, विशाल शेंडे, अमृत टाक, खुमेंद्र मेंढे, रत्नदीप दहिवले, माणिक घनाडे, संतोष नरुले, डॉ. वालदे, योगेन्द्र सेठीया, आकाश कोरे उपस्थित होते.केंद्र शासनावर प्रहार करताना नाना पटोले यांनी नोटबंदी, काळेधन, महागाई, शेतकरी विरोधी धोरणावर आगपाखड केली. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. माफी ही गुन्हेगारांना दिली जाते. आम्ही देशाचे पोशिंदे आहोत, गुन्हेगार नाही अशी टीका त्यांनी केली. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशाने आम्हाला नवी चेतना, नवी उर्जा प्राप्त झाली आहे. मतभेद विसरुन कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन करुन कार्यकर्त्यांची ताकद नेत्यांसोबत असेल तर सत्ता परिवर्तन दूर नाही असे मत माजी आ.राऊत यांनी व्यक्त केले.शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशनाना पटोले व काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून विजय राठोड, राकेश शुक्ला, कमल जायस्वाल, परेश उजवणे, रमेश भाग्यवंत, देवाजी कापगते, राजू पालीवाल (भाजप), हेमंत भांडारकर, शिला पटले (रॉका), तसेच आनंदकुमार जांभुळकर, यमू ब्राम्हणकर, शिला उईके, नाशिक शहारे, संजय नाकाडे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.