शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

लोकशाहीची वाटचाल हुकूूमशाहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:44 IST

देशात असलेल्या लोकशाहीची वाटचाल सध्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. ते संविधान व लोकशाही संपविण्याचे काम केंद्रातील विद्यमान सरकार करीत आहे.

ठळक मुद्दे नाना पटोले : अर्जुनी मोरगाव येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : देशात असलेल्या लोकशाहीची वाटचाल सध्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. ते संविधान व लोकशाही संपविण्याचे काम केंद्रातील विद्यमान सरकार करीत आहे. आमची लढाई याविरुद्ध आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न हाणून पाडावे, माझा लढा हा शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वंचितांसाठी आहे. याची पहिली प्रेरणा मला सर्वप्रथम अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून अनुभवायला मिळाली. असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी येथे केले.मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन ते बोलत होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष टोलसिंहभाऊ पवार हे होते. यावेळी मंचावर माजी आ. रामरतन राऊत, नामदेव किरसान, अमर वऱ्हाडे, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, भागवत नाकाडे, डॉ. बी.जी. भुतडा, अर्जुन नागपुरे, जगदीश मोहबंशी, राजेश नंदागवळी, होमराज कापगते, पं.स.च्या उपसभापती करुणा नांदगावे, विशाखा साखरे, आशा झिलपे, विलास गायकवाड, वंदना जांभुळकर, वंदना शहारे, जगदीश येरोला, मलेशाम येरोला, दीपक पवार, दिलीप डोये, विशाल शेंडे, अमृत टाक, खुमेंद्र मेंढे, रत्नदीप दहिवले, माणिक घनाडे, संतोष नरुले, डॉ. वालदे, योगेन्द्र सेठीया, आकाश कोरे उपस्थित होते.केंद्र शासनावर प्रहार करताना नाना पटोले यांनी नोटबंदी, काळेधन, महागाई, शेतकरी विरोधी धोरणावर आगपाखड केली. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. माफी ही गुन्हेगारांना दिली जाते. आम्ही देशाचे पोशिंदे आहोत, गुन्हेगार नाही अशी टीका त्यांनी केली. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशाने आम्हाला नवी चेतना, नवी उर्जा प्राप्त झाली आहे. मतभेद विसरुन कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन करुन कार्यकर्त्यांची ताकद नेत्यांसोबत असेल तर सत्ता परिवर्तन दूर नाही असे मत माजी आ.राऊत यांनी व्यक्त केले.शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशनाना पटोले व काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून विजय राठोड, राकेश शुक्ला, कमल जायस्वाल, परेश उजवणे, रमेश भाग्यवंत, देवाजी कापगते, राजू पालीवाल (भाजप), हेमंत भांडारकर, शिला पटले (रॉका), तसेच आनंदकुमार जांभुळकर, यमू ब्राम्हणकर, शिला उईके, नाशिक शहारे, संजय नाकाडे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.