शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लोकशाहीची वाटचाल हुकूूमशाहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:44 IST

देशात असलेल्या लोकशाहीची वाटचाल सध्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. ते संविधान व लोकशाही संपविण्याचे काम केंद्रातील विद्यमान सरकार करीत आहे.

ठळक मुद्दे नाना पटोले : अर्जुनी मोरगाव येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : देशात असलेल्या लोकशाहीची वाटचाल सध्या हुकूमशाहीकडे सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. ते संविधान व लोकशाही संपविण्याचे काम केंद्रातील विद्यमान सरकार करीत आहे. आमची लढाई याविरुद्ध आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न हाणून पाडावे, माझा लढा हा शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वंचितांसाठी आहे. याची पहिली प्रेरणा मला सर्वप्रथम अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून अनुभवायला मिळाली. असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी येथे केले.मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन ते बोलत होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष टोलसिंहभाऊ पवार हे होते. यावेळी मंचावर माजी आ. रामरतन राऊत, नामदेव किरसान, अमर वऱ्हाडे, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, भागवत नाकाडे, डॉ. बी.जी. भुतडा, अर्जुन नागपुरे, जगदीश मोहबंशी, राजेश नंदागवळी, होमराज कापगते, पं.स.च्या उपसभापती करुणा नांदगावे, विशाखा साखरे, आशा झिलपे, विलास गायकवाड, वंदना जांभुळकर, वंदना शहारे, जगदीश येरोला, मलेशाम येरोला, दीपक पवार, दिलीप डोये, विशाल शेंडे, अमृत टाक, खुमेंद्र मेंढे, रत्नदीप दहिवले, माणिक घनाडे, संतोष नरुले, डॉ. वालदे, योगेन्द्र सेठीया, आकाश कोरे उपस्थित होते.केंद्र शासनावर प्रहार करताना नाना पटोले यांनी नोटबंदी, काळेधन, महागाई, शेतकरी विरोधी धोरणावर आगपाखड केली. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. माफी ही गुन्हेगारांना दिली जाते. आम्ही देशाचे पोशिंदे आहोत, गुन्हेगार नाही अशी टीका त्यांनी केली. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशाने आम्हाला नवी चेतना, नवी उर्जा प्राप्त झाली आहे. मतभेद विसरुन कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन करुन कार्यकर्त्यांची ताकद नेत्यांसोबत असेल तर सत्ता परिवर्तन दूर नाही असे मत माजी आ.राऊत यांनी व्यक्त केले.शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशनाना पटोले व काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून विजय राठोड, राकेश शुक्ला, कमल जायस्वाल, परेश उजवणे, रमेश भाग्यवंत, देवाजी कापगते, राजू पालीवाल (भाजप), हेमंत भांडारकर, शिला पटले (रॉका), तसेच आनंदकुमार जांभुळकर, यमू ब्राम्हणकर, शिला उईके, नाशिक शहारे, संजय नाकाडे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.