शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

गाळे बांधकामाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:07 IST

नगर परिषद परिक्षेत्रातील रिसामा ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम व वाटप करण्यात आलेल्या व्यापारी गाळे प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी शासनाकडे पत्र प्रेषीत करुन केली आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागात बांधकाम : बेरोजगार युवकांचे शासनास पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : नगर परिषद परिक्षेत्रातील रिसामा ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम व वाटप करण्यात आलेल्या व्यापारी गाळे प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी शासनाकडे पत्र प्रेषीत करुन केली आहे. त्यामुळे व्यापारी गाळे बांधकाम व वाटप प्रकरण अधिकच चिघळत आहे.आमगाव नगर परिषद परिक्षेत्रात विनिर्दिष्ट झालेली ग्रामपंचायत रिसामा येथील पदाधिकारी व सदस्यांनी ठराव घेऊन शासनाची दिशाभूल करीत किंडगीपार नाल्याच्या काठावर पूरग्रस्त ठिकाणी व्यापारी गाळे बांधकामास परवानगी मिळविली. ग्रामपंचायतकडून २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्हा विकास निधी अंतर्गत ४० लक्ष रुपये कर्ज मागणी जिल्हा परिषदेला करण्यात आली होती. यात २० लक्ष रुपये प्राधान्य क्रमाने मंजूर करुन व्यापारी गाळे बांधकामाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली.सदर निधी अंतर्गत व्यापारी गाळे बांधकाम प्रस्तावही मंजूर करुन कंत्राटदाराच्या माध्यमातून बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु व्यापारी गाळे बांधकाम प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्याअगोदर बांधकाम जागेची पाहणी करण्यात आली नाही. पावसाळ्यात पुराने वेढलेल्या निर्जन अशा संभाव्य पुरग्रस्त जागेवर व्यापारी गाळे बांधकामाला मंजुरी देण्यात आली. यासाठी अनेक विभागाच्या दिशा निर्देशांना डावलून बांधकामाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे सदर बांधकाम प्रकरणावर प्रश्न उपस्थित झाले आहे.ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी नगर परिषद परिक्षेत्रात विनिर्दिष्ट झालेल्या आदशाची अंमलबजावणी केली नाही. तसेच व्यापारी गाळे बांधकाम पूर्ण न करताच व हस्तांतरणाची कार्यवाही टाळून गाळे वाटप प्रक्रिया आटोपून घेतली. व्यापारी गाळे वाटप प्रक्रिया राबवितांना यातही घोळ करण्यात आला. शासन आदेशाच्या दिशानिर्देशांची पायमल्ली करुन रक्त संबंधाच्या नातेवाईकांना वाटपात प्राधान्य देण्यात आले. तर सुशिक्षीत बेरोजगार व आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना टाळण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वाटप केलेले गाळे वादग्रस्त ठरले आहे.सदर व्यापारी गाळे वाटप प्रक्रिया शासनाने रद्द करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. तर गाळे बांधकाम हस्तांतरण करण्याची कार्यवाही प्रशासनाने पुढे केली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी व्यापारी गाळे बांधकामासाठी जिल्हा विकास निधीतून कर्जाची उचल केली. सदर कर्जाची रक्कम गैरप्रकारे व्यापारी गाळे बांधाकमावर खर्च करणे व व्यापारी गाळे वाटपात परस्पर विल्हेवाट लावल्याची तक्रार शासनाकडे करण्यात आली आहे. ग्रामपंचायतने केलेले व्यापारी गाळे बांधकाम व वाटप या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी शासनाने करावी अशी मागणी सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी पत्र पाठवून केली आहे.