शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

सामान्यांची पॅसेंजर सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:27 IST

मुंडीकोटा : कोरोनामुळे रेल्वे बंद झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. अशातच दिलासा म्हणून सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या ...

मुंडीकोटा : कोरोनामुळे रेल्वे बंद झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. अशातच दिलासा म्हणून सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. पण या गाडीचा या परिसरातील प्रवाशांना काहीच उपयोग नाही. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

कोरोनाने अनेक दारिद्र्यरेषेखालील व सामान्य नागरिकांचे जगणे हलाखीचे केले आहे. अशातच कामासाठी बाहेर पडणारी जनता ही गरीब आहे. अशा परिस्थतीत जीवन जगताना जनतेला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्य स्तरावर जगणाऱ्या नागरिकांनी पॅसेंजर व लोकल ईतवारी ते रायपूर, ईतवारी-डोंगरगढ, ईतवारी-बालाघाट, ईतवारी ते टाटानगर या पॅसेंजर गाड्या अनेक वर्षांपासून धावत होत्या. या गाड्या कोरोनामुळे बंद पडल्या आहेत. या गाड्यांचा लहान स्टेशनवर थांबा नाही. तालुक्याच्या व शहराच्या ठिकाणी बसने जाणे पडवडत नाही. तसेच आपले काम करून येणे-जाणे सोयीचे नाही. एसटीचे भाडे रेल्वेपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे सामान्यांची लूट होत असते. सवलती योजनांसह पुरेशा सुविधा या सामान्यांच्या हक्काच्या आहेत व असतात हे प्रशासनाने जाणून घ्यावे. फक्त एकच लोकल गाडी सुरू झाली असून ती ईतवारी स्टेशनवरून दुपारी ३ वाजता सुरू असते. तीच गाडी दुसऱ्या दिवशी गोंदिया स्टेशनवरून सकाळी १० वाजता सुटते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. गोंदियाला जाण्याकरिता लोकल गाडी नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून काळ्या-पिवळ्या वाहनाने प्रवास करावा लागतो.

.....

पॅसेंजर व लोकल सुरू करण्याची मागणी

नागरिकांसाठी पॅसेंजर व लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी मुंडीकोटा, गंगाझरी, काचेवानी, खात, रेवराल, तारसा या गावांतील गावकरी करीत आहेत.