शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

चुटियाच्या राखीला राज्यभरात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.

ठळक मुद्देशेणापासून राखी निर्मिती : टेंभरे दाम्पत्याने ठेवला आत्मनिर्भरतेचा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग ठप्प झाल्यामुळे उद्योग व व्यवसायांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली. कोरोनाच्या भीतीमुळे लाखो कामगार आपल्या स्वगृही परतले. अशाच परिस्थितीत मात्र, तालुक्यातील ग्राम चुटिया येथील एका महिलेने आत्मनिर्भर होत अनेक महिलांना रोजगार देत आदर्श निर्माण केला आहे. ग्राम चुटिया येथील प्रीती टेंभरे यांनी गाईच्या शेणापासून राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी बनवलेल्या या इको फ्रेंडली राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसेच दुसया राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून जनतेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यात आता भारत-चीन सीमावादामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेतात प्रीती यांना रक्षाबंधनाच्या उत्सवात गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना सूचली. त्यांनी कामाला सुरूवात करत आधी या संकल्पनेबाबत अभ्यास केला आणि त्यानंतर आपली ही संकल्पना साकार केली. आतापर्यंत त्यांनी गाईच्या शेणापासून जवळपास ^सहा हजार इको फ्रेंडली राख्या तयार केल्या. जिल्हा व राज्यच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, राजस्थान सारख्या इतर राज्यांतही या राख्यांना मागणी आहे.या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना रोजगाराशी संबंधित प्रशिक्षणही द्यायला सुरु वात केली आहे. गाईच्या शेणापासून राखी कशाप्रकारे तयार करता येते, हे देखील शिकविण्यात आले.प्रीती टेंभरे यांच्या लघु उद्योगात त्याचे पती ऋषी टेंभरे हे माकेर्टींगचे काम पाहतात. आपल्याकडे तयार केलेल्या राख्या बाजारात विक्रीकरीता जाताना कुठलीही कमी राहू नये, राख्यांना पॅक करून पोहोचविणे याकडे प्रीती यांच्या जाऊ श्वेता टेंभरे विशेष लक्ष देतात.गौहत्या थांबविण्याचा संदेशगाईपासून फक्त दूध न मिळविता तिच्यापासून मिळणाऱ्या शेणापासून औषधे व राख्या बनविणे इतकेच मर्यादित न राहता गौहत्या थांबविणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रीती सांगतात. विशेष म्हणजे, यासाठी राखीच्या मागच्या भागावर गायी वाचविण्याचा सामाजिक संदेशही दिला जात आहे. यापुढे गाईच्या शेणापासून दिवाळीनिमित्त इको फ्रेंडली दिवेदेखील बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन