शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

चुटियाच्या राखीला राज्यभरात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.

ठळक मुद्देशेणापासून राखी निर्मिती : टेंभरे दाम्पत्याने ठेवला आत्मनिर्भरतेचा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग ठप्प झाल्यामुळे उद्योग व व्यवसायांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली. कोरोनाच्या भीतीमुळे लाखो कामगार आपल्या स्वगृही परतले. अशाच परिस्थितीत मात्र, तालुक्यातील ग्राम चुटिया येथील एका महिलेने आत्मनिर्भर होत अनेक महिलांना रोजगार देत आदर्श निर्माण केला आहे. ग्राम चुटिया येथील प्रीती टेंभरे यांनी गाईच्या शेणापासून राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी बनवलेल्या या इको फ्रेंडली राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसेच दुसया राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून जनतेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यात आता भारत-चीन सीमावादामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेतात प्रीती यांना रक्षाबंधनाच्या उत्सवात गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना सूचली. त्यांनी कामाला सुरूवात करत आधी या संकल्पनेबाबत अभ्यास केला आणि त्यानंतर आपली ही संकल्पना साकार केली. आतापर्यंत त्यांनी गाईच्या शेणापासून जवळपास ^सहा हजार इको फ्रेंडली राख्या तयार केल्या. जिल्हा व राज्यच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, राजस्थान सारख्या इतर राज्यांतही या राख्यांना मागणी आहे.या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना रोजगाराशी संबंधित प्रशिक्षणही द्यायला सुरु वात केली आहे. गाईच्या शेणापासून राखी कशाप्रकारे तयार करता येते, हे देखील शिकविण्यात आले.प्रीती टेंभरे यांच्या लघु उद्योगात त्याचे पती ऋषी टेंभरे हे माकेर्टींगचे काम पाहतात. आपल्याकडे तयार केलेल्या राख्या बाजारात विक्रीकरीता जाताना कुठलीही कमी राहू नये, राख्यांना पॅक करून पोहोचविणे याकडे प्रीती यांच्या जाऊ श्वेता टेंभरे विशेष लक्ष देतात.गौहत्या थांबविण्याचा संदेशगाईपासून फक्त दूध न मिळविता तिच्यापासून मिळणाऱ्या शेणापासून औषधे व राख्या बनविणे इतकेच मर्यादित न राहता गौहत्या थांबविणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रीती सांगतात. विशेष म्हणजे, यासाठी राखीच्या मागच्या भागावर गायी वाचविण्याचा सामाजिक संदेशही दिला जात आहे. यापुढे गाईच्या शेणापासून दिवाळीनिमित्त इको फ्रेंडली दिवेदेखील बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन