शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

चुटियाच्या राखीला राज्यभरात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.

ठळक मुद्देशेणापासून राखी निर्मिती : टेंभरे दाम्पत्याने ठेवला आत्मनिर्भरतेचा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग ठप्प झाल्यामुळे उद्योग व व्यवसायांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली. कोरोनाच्या भीतीमुळे लाखो कामगार आपल्या स्वगृही परतले. अशाच परिस्थितीत मात्र, तालुक्यातील ग्राम चुटिया येथील एका महिलेने आत्मनिर्भर होत अनेक महिलांना रोजगार देत आदर्श निर्माण केला आहे. ग्राम चुटिया येथील प्रीती टेंभरे यांनी गाईच्या शेणापासून राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी बनवलेल्या या इको फ्रेंडली राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसेच दुसया राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून जनतेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यात आता भारत-चीन सीमावादामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेतात प्रीती यांना रक्षाबंधनाच्या उत्सवात गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना सूचली. त्यांनी कामाला सुरूवात करत आधी या संकल्पनेबाबत अभ्यास केला आणि त्यानंतर आपली ही संकल्पना साकार केली. आतापर्यंत त्यांनी गाईच्या शेणापासून जवळपास ^सहा हजार इको फ्रेंडली राख्या तयार केल्या. जिल्हा व राज्यच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, राजस्थान सारख्या इतर राज्यांतही या राख्यांना मागणी आहे.या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना रोजगाराशी संबंधित प्रशिक्षणही द्यायला सुरु वात केली आहे. गाईच्या शेणापासून राखी कशाप्रकारे तयार करता येते, हे देखील शिकविण्यात आले.प्रीती टेंभरे यांच्या लघु उद्योगात त्याचे पती ऋषी टेंभरे हे माकेर्टींगचे काम पाहतात. आपल्याकडे तयार केलेल्या राख्या बाजारात विक्रीकरीता जाताना कुठलीही कमी राहू नये, राख्यांना पॅक करून पोहोचविणे याकडे प्रीती यांच्या जाऊ श्वेता टेंभरे विशेष लक्ष देतात.गौहत्या थांबविण्याचा संदेशगाईपासून फक्त दूध न मिळविता तिच्यापासून मिळणाऱ्या शेणापासून औषधे व राख्या बनविणे इतकेच मर्यादित न राहता गौहत्या थांबविणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रीती सांगतात. विशेष म्हणजे, यासाठी राखीच्या मागच्या भागावर गायी वाचविण्याचा सामाजिक संदेशही दिला जात आहे. यापुढे गाईच्या शेणापासून दिवाळीनिमित्त इको फ्रेंडली दिवेदेखील बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन