शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
4
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
5
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
6
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
7
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
8
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
9
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
10
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
11
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
12
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
13
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
14
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
15
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
16
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
17
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
18
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
19
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
20
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
Daily Top 2Weekly Top 5

परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

 परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत.

ठळक मुद्देलिलाव करण्यास टाळाटाळ : पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे

    लाेकमत न्यूज नेटवर्ककेशोरी :  या परिसरातील वडेगाव (बंध्या) व धोबल या रेतीघाटांचा लिलाव न केल्यामुळे घरकुल व घरांचे बांधकाम अडचणीत आले आहे. घरबांधणीसाठी रेती हे अत्यंत महत्वाचे घटक असून रेतीशिवाय घर बांधकाम पूर्णत्वास जावू शकत नाही. हे शासनास माहिती असताना सुध्दा रेती घाट लिलाव प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे शासनाला मिळणारे लाखो रुपये बुडत आहेत. याची जाण ठेवून केशोरी परिसरातील रेती घाट लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. रेतीघाटांचा लिलाव होत नसल्यामुळे मंजूर झालेल्या घरकुलांचे काम अडले आहेत. रेतीशिवाय घरकुल बांधकाम कसे करावे असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे. जिल्हा प्रशासन हेतुपुरस्सर शासनाला मिळणाऱ्या रेती घाट लिलावापासून मिळणारे लाखो रुपयांचे नुकसान करीत आहे असा आरोप करीत रेती चोरी करणाऱ्यांकडून अवैधरित्या चिरीमीरी घेवून लाखो रुपयाची माया जमविणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी शासनानेच मार्ग मोकळा करुन दिल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी प्रकरणाला शासनच जबाबदार आहे हे निश्चित समजून कुंपणच शेत खात असेल तर यावर नागरिकांचा काहीच उपाय चालणार नाही असे वाटून जात आहे. रेतीघाट लिलाव प्रक्रिया थांबल्यामुळे घरकुलासह इतर लोकांच्या घर बांधणीचे काम प्रभावित झाले आहेत. यामुळे मात्र रेती चोरी प्रकरणे वाढत असून या प्रकरणी शासनच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी थांबविण्यासाठी रेतीघाटांचा लिलाव होणे गरजेचे आहे. करीता जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :sandवाळू