शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

 परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत.

ठळक मुद्देलिलाव करण्यास टाळाटाळ : पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे

    लाेकमत न्यूज नेटवर्ककेशोरी :  या परिसरातील वडेगाव (बंध्या) व धोबल या रेतीघाटांचा लिलाव न केल्यामुळे घरकुल व घरांचे बांधकाम अडचणीत आले आहे. घरबांधणीसाठी रेती हे अत्यंत महत्वाचे घटक असून रेतीशिवाय घर बांधकाम पूर्णत्वास जावू शकत नाही. हे शासनास माहिती असताना सुध्दा रेती घाट लिलाव प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे शासनाला मिळणारे लाखो रुपये बुडत आहेत. याची जाण ठेवून केशोरी परिसरातील रेती घाट लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. रेतीघाटांचा लिलाव होत नसल्यामुळे मंजूर झालेल्या घरकुलांचे काम अडले आहेत. रेतीशिवाय घरकुल बांधकाम कसे करावे असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे. जिल्हा प्रशासन हेतुपुरस्सर शासनाला मिळणाऱ्या रेती घाट लिलावापासून मिळणारे लाखो रुपयांचे नुकसान करीत आहे असा आरोप करीत रेती चोरी करणाऱ्यांकडून अवैधरित्या चिरीमीरी घेवून लाखो रुपयाची माया जमविणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी शासनानेच मार्ग मोकळा करुन दिल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी प्रकरणाला शासनच जबाबदार आहे हे निश्चित समजून कुंपणच शेत खात असेल तर यावर नागरिकांचा काहीच उपाय चालणार नाही असे वाटून जात आहे. रेतीघाट लिलाव प्रक्रिया थांबल्यामुळे घरकुलासह इतर लोकांच्या घर बांधणीचे काम प्रभावित झाले आहेत. यामुळे मात्र रेती चोरी प्रकरणे वाढत असून या प्रकरणी शासनच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी थांबविण्यासाठी रेतीघाटांचा लिलाव होणे गरजेचे आहे. करीता जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :sandवाळू