शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

 परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत.

ठळक मुद्देलिलाव करण्यास टाळाटाळ : पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे

    लाेकमत न्यूज नेटवर्ककेशोरी :  या परिसरातील वडेगाव (बंध्या) व धोबल या रेतीघाटांचा लिलाव न केल्यामुळे घरकुल व घरांचे बांधकाम अडचणीत आले आहे. घरबांधणीसाठी रेती हे अत्यंत महत्वाचे घटक असून रेतीशिवाय घर बांधकाम पूर्णत्वास जावू शकत नाही. हे शासनास माहिती असताना सुध्दा रेती घाट लिलाव प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे शासनाला मिळणारे लाखो रुपये बुडत आहेत. याची जाण ठेवून केशोरी परिसरातील रेती घाट लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  परिसरातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया गेल्या २ वर्षांपासून खोळंबली आहे. याचे कारण जाणून घेतले असता रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे कारण पुढे करुन रेतीघाटांचा लिलाव करणे थांबविण्यात आल्याचे समजले आहे. परंतु हे कारण संयुक्तीक वाटत नाही, उलट लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे रेती चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याचा वैयक्तीक फायद्याचा उद्देश सफल होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. रेतीघाटांचा लिलाव होत नसल्यामुळे मंजूर झालेल्या घरकुलांचे काम अडले आहेत. रेतीशिवाय घरकुल बांधकाम कसे करावे असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे. जिल्हा प्रशासन हेतुपुरस्सर शासनाला मिळणाऱ्या रेती घाट लिलावापासून मिळणारे लाखो रुपयांचे नुकसान करीत आहे असा आरोप करीत रेती चोरी करणाऱ्यांकडून अवैधरित्या चिरीमीरी घेवून लाखो रुपयाची माया जमविणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी शासनानेच मार्ग मोकळा करुन दिल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी प्रकरणाला शासनच जबाबदार आहे हे निश्चित समजून कुंपणच शेत खात असेल तर यावर नागरिकांचा काहीच उपाय चालणार नाही असे वाटून जात आहे. रेतीघाट लिलाव प्रक्रिया थांबल्यामुळे घरकुलासह इतर लोकांच्या घर बांधणीचे काम प्रभावित झाले आहेत. यामुळे मात्र रेती चोरी प्रकरणे वाढत असून या प्रकरणी शासनच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी थांबविण्यासाठी रेतीघाटांचा लिलाव होणे गरजेचे आहे. करीता जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून परिसरातील रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :sandवाळू