शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

खरीपासाठी ४४ हजार ३५० क्विंटल बियाण्यांची मागणी

By admin | Updated: April 29, 2016 01:52 IST

येणाऱ्या नवीन खरीप हंगामात पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महाबीजकडून सर्वाधिक आवंटन : ६० हजार ७०० मे.टन खत मिळणारगोंदिया : येणाऱ्या नवीन खरीप हंगामात पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग उत्साहाने या हंगामाच्या तयारीला लागला आहे. यावर्षी खरीपातील धानाचे क्षेत्र थोडे वाढणार असल्याने त्यादृष्टीने कृषी विभागाने बियाणे आणि रासायनिक खतांची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात १.९० लाख हेक्टर क्षेत्रासाठी ४४ हजार ३५० क्विंटल बियाणे मंजूर करण्यात आले आहेत.२०१६-१७ च्या खरीप हंगामाच्या मागणीनुसार महाबीजकडून ३० हजार ३०० क्विंटल तर खासगी कंपन्यांचे १४ हजार ५० क्विंटल बियाणे आवंटित करण्यात आले आहे. सर्वाधिक ७३५० क्विंटल बियाणे गोंदिया तालुक्यात तर सर्वात कमी ३ हजार क्विंंटल बियाणे सालेकसा तालुक्यात मंजूर करण्यात आले आहे.खरीप हंगामा २०१६ साठी ६० हजार मे.टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने नोंदविली. प्रत्यक्षात ६० हजार ७०० मे.टन आवंटन मंजूर झाले. १ एप्रिल रोजीच्या नोंदीनुसार ८ हजार ५५७.२० मे.टन रासायनिक खत आणि १ हजार ११४.८० मे.टन मिश्र खताचा साठा शिल्लक आहे. नवीन हंगामासाठी मंजूर रासायनिक खतांमध्ये युनिया २५ हजार ३०० मे.टन, डिएपी २८०० मे.टन, एमओपी २५०० मे.टन,, एसएसपी १८८ मे.टन, एकूण संयुक्त खते ११ हजार ८०० मे.टन असे एकूण ६० हजार ७०० मे.टन आवंटन मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. (जिल्हा प्रतिनिधी)