शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांपासूनची मागणी थंडबस्त्यात

By admin | Updated: July 23, 2015 01:49 IST

दिशाभूल : १८० एकर जमिनीवर शेतकऱ्यांची नावे नोंद नाही

आमगाव : रिसामा येथील १८० एकर शेतकऱ्यांची स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीवर त्यांच्या नावांची नोंद नाही. सतत दहा वर्षांपासून नावाची नोंदणीसाठी शेतकरी लढत आहेत. शेती सर्व्हे करताना गावठानच्या नावावर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली, असा आरोप माजी प्राचार्य व रिसामा येथील शेतकरी शामराव बहेकार यांनी केला आहे. उपसंचालक भूमी अभिलेख विभाग नागपूर यांना ५ जून २००६ रोजी स्मरण पत्र देण्यात आले. त्यात रिसामा येथील १८० एकर शेती सर्व्हे करताना गावठानात समाविष्ट करून वैयक्तिक कब्जाप्रमाणे गटनिहाय सर्व्हे न करण्यात आल्याबद्दल ३१ मार्च व १९ मे रोजी उपसंचालक नागपूरला लेखी पत्र देण्यात आले. स्मरणपत्र ५ जून २००६ ला शेतकरी शामराव बहेकार रा. रिसामा यांनी दिला. त्यात १८० एकर शेतीवर शेतकऱ्यांचे नाव व आराजी न दाखविता शेतीकडे दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा व नकाशा मिळत नाही. जमिनीचे एन.ए. करता येत नाही. जमीन विक्री करता येत नाही. पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी शेतकरी शामराव बहेकार यांनी करून ते निवेदन मुख्यमंत्री, महसुलमंत्री, संचालक जमा बंदी आयुक्त यांना दिले. मात्र दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरात न्याय मिळाला नाही. सदर प्रकरणात ग्रामपंचायत रिसामा यांनी ठराव घेऊन ३० एप्रिल २००८ रोजी अधिकाऱ्याला दिले. मात्र नियम धाब्यावर ठेऊन कोणतीच कार्यवाही झाली नाही. उलट जेवढा पत्रव्यवहार झाला तो कागदी व्यवहार अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत टाकला. आता याविरूध्द आंदोलन भूमापन कार्यालयासमोर करण्याचा इशारा संजय बहेकार, शामराव बहेकार यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)