शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

१० वर्षांपासूनची मागणी थंडबस्त्यात

By admin | Updated: July 23, 2015 01:49 IST

दिशाभूल : १८० एकर जमिनीवर शेतकऱ्यांची नावे नोंद नाही

आमगाव : रिसामा येथील १८० एकर शेतकऱ्यांची स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीवर त्यांच्या नावांची नोंद नाही. सतत दहा वर्षांपासून नावाची नोंदणीसाठी शेतकरी लढत आहेत. शेती सर्व्हे करताना गावठानच्या नावावर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली, असा आरोप माजी प्राचार्य व रिसामा येथील शेतकरी शामराव बहेकार यांनी केला आहे. उपसंचालक भूमी अभिलेख विभाग नागपूर यांना ५ जून २००६ रोजी स्मरण पत्र देण्यात आले. त्यात रिसामा येथील १८० एकर शेती सर्व्हे करताना गावठानात समाविष्ट करून वैयक्तिक कब्जाप्रमाणे गटनिहाय सर्व्हे न करण्यात आल्याबद्दल ३१ मार्च व १९ मे रोजी उपसंचालक नागपूरला लेखी पत्र देण्यात आले. स्मरणपत्र ५ जून २००६ ला शेतकरी शामराव बहेकार रा. रिसामा यांनी दिला. त्यात १८० एकर शेतीवर शेतकऱ्यांचे नाव व आराजी न दाखविता शेतीकडे दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा व नकाशा मिळत नाही. जमिनीचे एन.ए. करता येत नाही. जमीन विक्री करता येत नाही. पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी शेतकरी शामराव बहेकार यांनी करून ते निवेदन मुख्यमंत्री, महसुलमंत्री, संचालक जमा बंदी आयुक्त यांना दिले. मात्र दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरात न्याय मिळाला नाही. सदर प्रकरणात ग्रामपंचायत रिसामा यांनी ठराव घेऊन ३० एप्रिल २००८ रोजी अधिकाऱ्याला दिले. मात्र नियम धाब्यावर ठेऊन कोणतीच कार्यवाही झाली नाही. उलट जेवढा पत्रव्यवहार झाला तो कागदी व्यवहार अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत टाकला. आता याविरूध्द आंदोलन भूमापन कार्यालयासमोर करण्याचा इशारा संजय बहेकार, शामराव बहेकार यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)