शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

ओडिसाच्या धर्तीवर धानाला हमीभाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:11 IST

महाराष्टÑापेक्षा अप्रगत असलेल्या ओडिसा राज्यातील सरकारने धानाला २ हजार ९९० रुपये हमीभाव जाहीर केला आहे.

ठळक मुद्देखासदार नाना पटोले : दोन्ही जिल्ह्यात पिकांची स्थिती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्टÑापेक्षा अप्रगत असलेल्या ओडिसा राज्यातील सरकारने धानाला २ हजार ९९० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. याच धर्तीवर केंद्र आणि राज्य सरकारने धानाला २ हजार ९९० रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी लावून धरणार असून त्यासाठी वेळ पडल्यास आंदोलनात्मक पावित्रा असा इशारा खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी (दि.१५) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.गोंदिया भंडारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि अन्य मुद्यांसंदर्भात गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पावसाअभावी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन उपाय योजना राबविण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सुध्दा अनुकुलता दर्शविली असून ३० सप्टेंबरपर्यंत दोन्ही जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल मागवून त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या वेळी राज्य सरकारने मच्छीमारांसाठी काढलेल्या अन्यायकारक जीआर रद्द करुन त्यातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली. ती देखील त्यांनी मान्य केली असून तो जीआर देखील रद्द करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीचे तलाव मत्स्यपालन संस्थांना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी अतिरिक्त पैसे सुध्दा भरावे लागणार नाहीत. राज्य सरकारने नोकरभरतीत ओबीसींचे एकही पद रिक्त नसल्याचे जाहीर केले होते. मात्र ते पूर्णपणे चुकीचे असून बिंदूनामावलीप्रमाणे मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गाची पदे रिक्त आहेत. नव्याने बिंदूनामावली जाहीर करुन ही सर्व पदे भरण्याची मागणी त्यांच्याकडे केली.ओबीसी विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्ती दिली जात नाही. ती वेळेवर देण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केल्याचे पटोले यांनी सांगितले.कृषी विभागाने पाठविला चुकीचा अहवालपावसाअभावी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात ७० टक्के रोवण्या झाल्या नाहीत. तर केलेल्या रोवण्या देखील संकटात आल्या आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षांत प्रथमच अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र दोन्ही जिल्ह्यातील कृषी विभागाने ८० टक्के रोवण्या झाल्याचा अहवाल शासनाला पाठविला. तो पूर्णपणे चुकीचा असून तो अहवाल ग्राह्य धरु नये, अशी विनंती सुध्दा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचे पटोले यांनी सांगितले.पालकमंत्र्यांनाही जाब विचारणारलोकांचा प्रतिनिधी आपण काम करित असून त्यांच्या तक्रारींचे वेळीच निराकरण होणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यात विविध कामे रखडली असून कामे होत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हीच स्थिती राहिली तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला याचा जाब विचारण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचे पटोले म्हणाले.