शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कर्मचारी हस्तांतरापूर्वी आकृतीबंध निश्चित करा

By admin | Updated: June 19, 2017 01:28 IST

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने अधिकारी-कर्मचारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनाचा इशारा : कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी जलसंधारण विभागाकडेलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने अधिकारी-कर्मचारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही कृषी अधिकारी-कर्मचारी जलसंधारणाकडे तर काही कृषी विभागाकडेच राहणार आहेत. अशात हस्तांतरापूर्वी कृषी विभागाचा आकृतीबंध निश्चित करुन प्रलंबित मागण्या मंजूर करण्याची आग्रही मागणी कृषी सहायक संघटनेने केली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करु अशा इशारा सुध्दा कृषी सहायक संघटनेने दिला आहे. नव्या मृद आणि जलसंधाराण विभागासाठी ३१ मे रोजी शासन आदेश जारी करण्यात आला. कृषी विभागाची अंदाजे दहा हजार पदे नव्या जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित होणार आहेत. सहायकाच्या पदोन्नतीचे महत्वाचे पद जलसंधारण विभागाने घेतले आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने कृषी सहायकाच्या पदोन्नतीची संधी हिरावून घेतली जात असल्याची भावना कृषी सहायक संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. कृषी विभागात बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे आकृतीबंध निश्चित झाल्याशिवाय अधिकारी कर्मचारी हस्तांतरण योग्य ठरणार नाही, अशी संघटनेची भूमिका आहे. त्यामुळे कृषी सहायक संघटनेने तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे कृषिमंत्री पाडुरंग पुंडकर यांना निवेदन पाठवून आग्रह केला की, कृषी मंत्र्यांनी कृषी विभागाच्या प्रशासकीय प्रमुखांची बैठक घ्यावी. त्यातून कृषी विभागाची पुनर्बांधणी आणि शेतकरी सेवार्थ आकृतीबंध निश्चित होईल, अशी अपेक्षा संघटनेची आहे. कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षे कालावधी शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेत अंतर्भूत करणे, आंतरविभागीय बदल्यांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करणे या व इतर मागण्या कृषी सहायक संघटनेच्या आहेत. सदर मागण्यांवर विचार न झाल्यास २१ ते २४ जून दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण करण्यात येईल. १७ जून रोजी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर मोर्चा, १ जुलै रोजी आयुक्त कार्यालयावर मोर्चा व निदर्शने करण्यात येईल. एवढ्यावर शासनाने दुर्लक्ष केल्यास १० जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात येईल, अशा इशारासुध्दा कृषी सहायक संघटनेने दिला आहे. सालेकसा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.के. ठाकूर, राज्य कार्यकारिणी सदस्य जी.ए. चौधरी, रविशंकर भगत, जिल्हा सचिव इंद्रपाल बागडे, देवेंद्र पारधी, प्रवीण सोनी, हिवराज गजभिये, सुरेंद्र खुणे, तिर्थराज तुरकर, जे.टी. मेंढे, राखलाल भगत आदींनी तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांना निवेदन सादर केले.