शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

जबाबदारी कमी; ताण कायम!

By admin | Updated: May 23, 2014 00:01 IST

शालेय विद्यार्थ्यांकरीता महत्वपूर्ण व आवश्यक असणारी पोषण आहार योजना केंद्र शासन व शासनाच्या सहकार्याने राबविली जात आहे. या योजनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले,

काचेवानी : शालेय विद्यार्थ्यांकरीता महत्वपूर्ण व आवश्यक असणारी पोषण आहार योजना केंद्र शासन व शासनाच्या सहकार्याने राबविली जात आहे. या योजनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले, मात्र शिक्षकांच्या मानसिक त्रासातही वाढ झाल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीपासून पोषण आहारातून मुख्याध्यापकांची मुक्तता व्हावी, अशी मागणी शिक्षक संघटना सातत्याने करत होत्या. याची दखल घेत राज्य शासनाने पुढील शैक्षणिक सत्र २०१४-१५ करिता शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेकडे देण्याचे ठरवले आहे. या प्रकाराने मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी झाली असली तरी ताण मात्र कायम असल्याचे जाणवते. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार, शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्याबाबत पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेकडे दिल्याचे सांगितले आहे. शालेय पोषण आहारात धान्याची साठवणूक करणे, प्रत्येक दिवसाचा खर्च व जमा हिशेब ठेवणे, शिजविणार्‍या महिलांची निवड करणे, माजी पाल्यांचा खर्च सांभाळणे, चवदार जेवणाची व्यवस्था करणे, जेवणाला चाखून पाहणे, पोषण आहारात विषबाधा किंवा अन्य आपत्तीजनक संकटे निर्माण झाल्यास जबाबदारी स्वीकारणे, धान्यात किंवा अन्य साहित्यात कमी-जास्त झाल्यास कारवाईसाठी जबाबदार असणे अशा अनेक गंभीर समस्या बचत गटाला झेलाव्या लागणार आहेत. ग्रामीण भागात बचत गटाची निवड शालेय पोषण आहार शिजवून देण्याकरिता शालेय व्यवस्थापन समितीने करावी आणि स्वयंपाकी व मदतनिसांची निवड संबंधित बचतगटाने करावयाची आहे. बचत गटाने नोंदविलेली मागणी बरोबर असल्याचे मुख्याध्यापकांना प्रमाणीत करायचे आहे. मुख्याध्यापकांनी धान्य साठा आणि इतर हिशेबाचे अभिलेख महिन्यातून दोन वेळा तपासून याबाबतचा अहवाल गोपनियरित्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडे पाठवायचा आहे.ग्रामीण भागातील शाळांत रोज किती मुलांनी जेवण केले. आहारात काय मेनू होता. यापासून मुख्याध्यापकाला स्वतंत्र ठेवायचे आहे. या व्यतिरिक्त निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पूरवठा झाल्यास किंवा विषबाधा झाल्यास, शिल्लक माल व नोंदीनुसार आवश्यक माल यामध्ये तफावत आढळल्यास बचत गटावर कारवाई करण्याची शिफारस मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती व गटशिक्षणाधिकार्‍यांकडे करायची आहे. मुख्याध्यापकांच्या शिफारशीवर संबंधित यंत्रणा कारवाई करेल. शिक्षकांनीसुद्धा पोषण आहाराच्या कामात मुख्याध्यापकांना सहयोग करायचे आहे. शिक्षकांना दिवसाचे काम वाटून दिल्यास मुख्याध्यापकांवर ताण येणार नाही, असे परिपत्रकात सांगितले आहे. पोषण आहार महिला बचत गटाकडे दिले असले तरी मुख्याध्यापकांचा ताण कमी झालेला नाही, हे शासनालासुद्धा माहीत आहे. आहाराची चव प्रथम शिजविणार्‍यांनी, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी व नंतर मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षकांनी घेवूनच विद्यार्थ्यांना देवून वहीत तशी नोंद ठेवायची आहे. शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी बचत गटाची असल्याचे सांगून यात मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येवू नये. चौकश्ीअंती योग्य निर्णय घेण्याचे सूचविले आहे. अन्न शिजविणे, स्वयंपाकाची भांडी/ताटांची सफाई व भोजनानंतर शालेय परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी बचत गट आणि आहार शिजविणार्‍या यंत्रणेची राहणार आहे. सावधानतेचा ईशारा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक रुग्णालय, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा यांचे दुरध्वनी क्रमांक शाळेमध्ये तसेच बचत गटाने ठेवायचे आहेत.परित्रत्रकाप्रमाणे मुख्याध्यापकांची जबाबदारी काही प्रमाणात कमी झाली, हे सत्य असले तरी ताण कमी झाल्याचे दिसून येत नाही. बचत गटाला पोषण आहाराचे काम दिल्याने शालेय पोषण आहाराची प्रत योग्य राहणार असून भविष्यात वादंग निर्माण होण्याच्या शक्यतेला टाळता येणार नाही. (वार्ताहर)