शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांतील नाल्या जमिनीत गडप

By admin | Updated: June 13, 2015 00:55 IST

तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्राम पंचायतीपैकी एक कावराबांध ग्राम पंचायतीअंतर्गत पाचही गावात मागील १० वर्षापासून ...

सालेकसा : तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्राम पंचायतीपैकी एक कावराबांध ग्राम पंचायतीअंतर्गत पाचही गावात मागील १० वर्षापासून नाल्याची सफाई करून गाळ उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व नाल्या जमिनीत गडप झाल्या आहेत. परिणामी पावसाचे पाणी दरवर्षी भर रस्त्यावरुन वाहते. काही ठिकाणी घरांच्या भिंतींवर आदळून वाहते. त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरण्यासोबतच घरांच्या भिंती कोसळण्याच्या वाटेवर आल्या आहेत. एकूण पाच गावांमध्ये पसरलेली ग्रामपंचायत कावराबांध येथे कावराबांध, मोहाटोला, कुनबीटोला, गोवारीटोला आणि ब्राम्हणटोला या पाच गावाचा समावेश असून एकंदरित चार वॉर्डामध्ये विभाजीत करण्यात आले आहे. एकूण चार वॉर्ड मिळून ११ सदस्यांची ग्राम पंचायत असून तालुक्यातील क्षेत्राफळाच्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून सुद्धा एक मोठी ग्राम पंचायत मानली जाते. त्यानुसार शासनाच्या विविध योजना सुद्धा येतात व निधी सुद्धा उपलब्ध होतो. परंतु त्या प्रमाणात गावाचा विकास झालेला दिसत नाही. आज काही अपवाद वगळता अनेक रस्ते सिमेंटीकरण झाले नाही, सांडपाण्यासाठी किंवा पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या नाही. काही मोजक्या ठिकाणी नाल्या गटारे बनविण्यात आल्या परंतु त्यांची कधीही सफाई करण्यात आली नाही. मागील १०-१५ वर्षापूर्वी बनलेल्या नाल्या भुई सपाट झालेल्या दिसत आहेत. अनेक ठिकाणी नाल्यांचे अस्तीत्वच राहीले नाही. दरम्यान ग्राम पंचायतवर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्राम सेवक बदलत राहीले. परंतु मूळ समस्या जशाच्या तशा बनून आहेत. ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी फक्त आपली आर्थिक स्थिती भक्कम कशी करता येईल याच्या साठीच धावपड करीत आहेत व जन समस्येकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे गावातील लोकांमध्ये नाराजीचे सूर निघत आहे.दरम्यान नाली सफाईबद्दल सरपंच व सचिव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, नाली सफाईसाठी विशेष तरतूद नसून इतर योजनेतून समायोजन करुन रक्कमेची तरतूद करण्यात येईल. तसेच मजूर उपलब्ध झाल्यास नाली सफाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)