शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

विंधन विहिरींमुळे पाण्याच्या पातळीत घट

By admin | Updated: May 14, 2016 01:49 IST

अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

विहिरींना बगल : विंधन विहिरींचे खोदकाम जोमात रावणवाडी : अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पूनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे. पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहीर खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. कलांतराने आता विहीर खोदण्यासाठी लागणारी मोकळी जागा, विहीर खोदण्या नंतर विहीरीतून निघणारी माती अलवाची विन्हेवाट लावण्याचा प्रश्न यातूनच विंधन विहीर खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येतो. विंधन विहिरीमधून निघणारे पाणी शुद्ध व आरोग्यास हानीकारक राहत नसल्याने विहिरीस पर्याय म्हणून जिल्ह्यात ठिक-ठिकाणी हातपंप खोदकामास सुरूवात झाली आहे. विहीर उभारण्यासाठी भुपृष्टावर जवळपास ४० ते ६० फुट पर्यंत खोदकाम करावे लागते. मात्र विंधन विहीर खोदण्या करीता फार अल्पशी जागा लागत असून त्वरीत पाण्याचा उपसा सुरू होतो. हात पंपावर मोटारपंप बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपशा केला जात असल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पावसाळ्यात पडलेले पाणी विहिरीमध्ये थेट जमा होते. मात्र हात पंपाचे तसे नाही पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी हात पंपात मुरतच नाही. पावसाचे पाणी ४० ते ५० फूटापर्यंत झिरण्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी लागतो तत्पूर्ती जमीनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाला असल्याने पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. विहिरीमधील पाणी व हातपंपामधील पाणी उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने सध्या उभारण्यात येणाऱ्या हातपंपासाठी आणखी खोल खोदावे लागत आहे. काही वर्षापूर्वी १५ ते २० फुटावर वाटेल तसे मुबलक पानी विहिरींना लागत होते. परंतु आता भुगर्भातील पाण्याची पातळी कमी आल्याने विहीर खोदने फार कमी झाले आहे. तसेच हात पंपासाठी ही जास्तीत जास्त खोदावे लागत आहे. या प्रकारावर वेळीच लक्ष दिले नाही तर काही वर्षात या भागात पाण्याकरिता हाहाकार होण्याची चिन्हे आतापासूनच दिसून येत आहे. (वार्ताहर)