शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तालुक्यात दुष्काळ घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:31 IST

तिरोडा तालुक्यामध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी धानपिकाची रोवणी केली नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने संपूर्ण तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : तिरोडा तालुक्यामध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी धानपिकाची रोवणी केली नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने संपूर्ण तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.यंदा हवामान खात्याच्या अंदाजामुळे तिरोडा तालुक्यातील संपूर्ण शेतकºयांनी मृग नक्षत्राची चाहुल लागताच शेतामध्ये मशागत करण्यास सुरुवात केली. पण रोहिणी नक्षत्राने दगा दिला. पुन्हा शेतकरी रात्रंदिवस शेतीची मशागत करीत होते. मृग नक्षत्रामध्ये शेतकºयांनी शेतामध्ये पºहे टाकले. रोपवाटिका लवकर होईल, यासाठी शेतीची मशागत ट्रॅक्टरने केली. शेतकºयांनी पºहांना रासायनिक खताचा डोज दिला. पºहे चांगले वाढले. पण पावसाचा लहरीपणा सुरु झाला. रोहणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्प, आश्लेषा व मघा हे सर्वच नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.हवामान खात्याचे अंदाज देखील वांरवार चुकत आहेत. हवामान खात्यावरील शेतकºयांचा विश्वास उडाला आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांनी रोवणीची कामे आटोपली. मात्र बºयाच शेतकºयांची रोवणी खोळंबली आहे. यंदा अल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी शेतामध्ये धानाची रोहणी केली नाही. पºहेसुध्दा उन्हाने वाळत, करपत आहेत. आॅगस्ट महिन्यामध्ये हलक्या धानाची मुदत निघून जाते. सप्टेंबर महिन्यामध्ये हलक्या धानाची लोंब निघतात. फक्त १३० ते १४० दिवसांमध्ये धानाची पुन्हा मुदत संपत आहे. आॅगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी आला. त्यामुळे धानापिकांची रोपे करपली आहेत.